Tuesday 24 May 2011

एक धागा सूखाचा

प्रेमचंदांची  एक कथा आहे. कधी काळ ऐकलेली...
दोन मित्र होते. दोघे ही अगदी गरीब . नोकरी नाही हाती पैसे नाहीत. काही काम मिळते का ते शोधत गावभर फिरायचे आणि रात्री जेवायला मिळाले तर जेवायचे अथवा पाणी पिऊन झोपायचे हा त्यांचा दिन क्रम
हिवाळ्या चे दिवस होते बरीच थंडी होती. दिवस भर वणवण फिरून काहीच काम मिळाले नव्हते नुसतीच पायपीट.
शिणलेल्या देहाला विश्रांती साठी झोपडीत आश्रय....
अशा स्तिथीत झोपडीच्या दाराला अडसर म्हणून लावलेली वीट वार्‍याने निघाली. दार थडाथडा आउअटू लागले.
बोचरी थंडी आणि वारा आत येऊ लागला...
पहिल्या मित्राने दुसर्‍याला सांगितले....
जरा दार बंद करतोस का.
दुसरा म्हणाला ...मी दमलोय वणवण भटकून. शिवाय सकाळपासून अन्नाचा कण नाही गेला पोटात.
"माझी काय वेगळी परिस्थिती आहे " पहिला म्हणाला " आपण दोघे ही बरोबर होतो की"
"पण मी आजारी आहे तू उठून दार लाव की"
"माझी पाठ गेलीय कामातून"
"माझ्या पायात गोळे आले आहेत"
दोघेही स्वतः किती शिणलोय हे सांगत होते. कोणाचेच पारडे खाली जात नव्हते.
" मी लहान पणी किती खस्ता खाल्या...... धाकट्या भावंडांचे सर्व मलाच करावे लागायचे. आईचे प्रेम कधी मिळालेच नाही"
"मी सुद्धा ते केलय सावत्र आईचा छळ सोसलाय"
दोघांच्या व्यथा सारख्याच होत्या.
शेवटी दोघानी ठरवले की ज्याने जास्त दु:खे भोगली असतील तो झोपेल आणि दुसरा उठून दार लावेल
" मी लहान पणी फार दु:ख भोगले आहे दारुड्या बापाचा पाठ मोडेस्तोवर मार खाल्लाय" पहिला म्हणाला.
"आणि मी सावत्र आईचा" दुसरा म्हणाला.
" मी जेवत असताना समोरचे ताट भिरकावून दिले होते बापाने. मारहाणीत त्याने माझा हात मोडला"
" सावत्र आईने मला तापल्या तव्याचे चटके दिले होते"
".....@#......."
"!!!......----"
दोघे ही मित्र आपापली दु:खे सांगत होते.
दोघांचीही दु:ख्खे तुल्यबळ होती. कोणीच हार जायला तयार नव्हते.
दोघानीही अगदी आठवत होते त्या वयापासून आठवत होती ती सगळी दु:खे उगाळून झाली.
पहिल्या मित्राला हळूहळु राग येऊ लागला.
बाकी काही नाही निदान इतरांपेक्षा आपल्या कडे अभिमान बाळगावा असे काहितरी होते तेच कोणीतरी हिरावून नेत आहे असे त्याला वाटू लागले.
रागाच्या तिरीमीरीत तो ऊठला त्याने दुसर्‍याला लाथाबुक्क्यानी बदडून काढले.
मित्राला मारताना संतापाने तो रडत होता. मारून मारून पहिला मित्र दमला. दुसरा अर्ध्या बेशुद्ध अवस्थेत होता. त्याला आता माराच्या वेदनाच जाणवत नव्हत्या.
भान आल्यावर पहिल्या मित्राला दुसर्‍याची अवस्था जाणवली. तो खजील झाला. त्याने दुसर्‍याची माफी मागितली. त्याला कुठे लागलेखुपले आएह का ते पाहिले. त्याची पाठ चेपू लागला. दुसरा मित्र ग्लानीत क्षीण हसला.
पहिल्या मित्राला त्या अवस्थेत मित्राचे हसणे पाहून नवल वाटले.
"फार मारले नी मी तुला" पहिला खजील होत म्हणाला
" हरकत नाही ...तू संतापाने मारलेस्.........जाऊदेत. सूखे नव्हतीच कधी आयूष्यात. दु:खेच होती. तु प्रत्येक दु:खाच्या बाबतीत आप्ण समसमान होतो. पणआज मी त्या बाबतीत तुझ्यापेक्षा वरचढ ठरलोय. आपला काहीच दोष नसताना मित्राने; लाथाबुक्यानी मारल्याचे दु:ख मी तुला मिळू देणार नाही"

No comments:

Post a Comment