Saturday 30 April 2011

एक मे - द हार्ट कनेक्षन

कलेला भाषेच्या सीमा अडवू शकत नाहीत हे पुन्हा सिद्ध होत असते. १ मे या एकाच दिवशी निर्मान झालेल्या गुजरात आणि महाराष्ट्र या शेजार्‍यांमध्ये केवल भौगोलीक नाही तर बर्‍याच गोष्टी समान आहेत.
संस्कृती,खाद्यपदर्थ लोकांचे स्वभाव , श्रीखंड , पुरणपोळी पोहे( गुजरातीत पौवा) सुरळीच्या वड्या( खाम्डवी) असे अनेक समान धागे आहेत.
पण या सगळ्याव्यतीरिक्त एक समान धागा गुजराती आणि मराठी भाषीकांच्यात समान आहे तो म्हणजे नाटक आणि रंगभूमीचे प्रेम.
मराठी रंगभूमीला १५० वर्षांची परंपरा आहे. तीच गोष्ट गुजराती रंगभूमीची..मराठी आणि गुजराथी नाट्य परंपरेला संस्कृत नाटकांचा वारसा लाभला
ज्या काळात बालगंधर्व, किर्लोस्कर नाटक कंपनी , गोविन्द बल्लाळ देवल यांनी मराठी रम्गभूमीला भक्कम पाया दिला अगदी त्याच काळात मदन थिएटर्स,देसी नाटक समाज तेच कार्य गुजराथी रंगभूमीवर करीत होते.
दोन्ही राज्यांची निर्मीती झाल्यानंतरचा गेल्या ५० वर्षाचा काल पाहिला तर आश्चर्यकाररित्या गुजराथी आणि मराठी रंगभूमीची धाव समांतरपणे झाले आहे.
गावोगावी होणार्‍या एकांकीका स्पर्धा नी नव्या मराठी रम्गभूमी चा पाया रचला. सिनेमा,टीव्ही सारख्या नव्या माध्यमांचे आव्हान समर्थपने पेलायला बळ दिले आहे.
पुरुषोत्तम करंडक ,राज्य नाट्य स्पर्धा , छबीलदास चळवळीने मराथी रंगभूमीला अनेक नव्या दमाचे समर्थ अभिनेते ,लेखक,दिग्दर्शक दिले. महेश एलकुंचवार , जब्बार पटेल, अतुल कुल्कर्णी , सतीश आळेकर ही नावे.
मुम्बई तील भारतीय विद्य भवन्स च्या स्पर्धा , आय एन टी च्या आंतर महाविद्यालयेन स्पर्धा नी गुजराथी रंगभूमी बबत हेच केले. या स्पर्धंमधून कांती मडीया , प्रबोध जोशी , परेश रावळ , मुकेश रावळ ,सुजाता मेहता , सिद्धार्थ रांदेरीया यांसारखी हिरे निर्माण केले.
साधारणतः १९६० च्या दशकात मराठी रंगभूमी वर बरेच बदल होत होते. जुन्या संगीत रंगभूमीचा जवळजवळ अस्तच झाला होता. नाटकाच्या संदर्भात नुसते तात्रज्ञानातच नाही तर संहीतांच्या विषयांत सादरीकीकरणात बदल होत होए. लोकांच्या मानसीकतेतच बदल होत होते.
याच काळात गुजराथी रम्गभूमीदेखील अशाच संक्रमणातून जात होती.ज्येष्ठ गुजराथी रंगकर्मी कान्ती मडीया एक वेगळाच विचार केला. लोकानुनय आणी सवंग लोकप्रीयतेच्या फसव्या सापळ्यातून गुजराथी रंगभूमीला वाचवायचे असेल तर काही वेगळा माफ्ग अनुसरावा लागेल. या विचाराने ते झपाटून गेले.
मुम्बई ही नेहमीच गुजराथी आणि मराठी रंगभूमी साठी सांस्कृतीक राजधानी राहिली आहे. कान्ती मडीयांसाठी मराठी रंगभूमी हा नैसर्गीक पर्याय होता.
मो ग रांगणेकरांच्या नाट्य निकेतन मध्ये जाउ लागले. तेथे कान्ती मडीयांची गाठ पडली ती प्रभाकर पणशीकरांशी .
आणि गुजराथी रंगभुमीसाठी एक नवा अध्याय सुरु झाला. प्रभाकर पणशीकरानी मराठी नाट्यसंपदा मार्फत केलेली बहुतेक नाटके कान्ती मडीयानी गुजराथी नाट्यसंपदा मार्फत केली.
अशृंची झाली फुले , अखेरचा सवाल मला काही साम्गायचय , पुत्रकामेष्ठी , तो मी नव्हेच चा गुजराथी "हुं ते नथीज" हा सुपर हीट्ट अवतार होता.
ही बहुतेक नाटके मराठी प्रेक्षकवर्ग डोळ्यासमोर ठेवुन लिहीलेली होती. निर्माण केली होती. पण गुजराथी प्रेक्षकाना सुद्धा त्यातली पात्रे ही गुजराथी समाजातीलच म्हणुनच भावली.
छेल चबीलो हा पुलंच्या तुझे आहे तुजपाशी चा गुजराथी अवतार तीच जादू करून गेला.
थोड्या वेगळ्या विषयावर असलेल्या सतीश आळेकरांच्या बेगम बर्वे चा गुजराथी प्रयोग मास्टर फुलमणी हा अगदी चपखल पणे झाला. गुजरथी प्रेक्षकाना त्याची नाळ पारशी थेअटर्स च्या जुन्या नाटकंशी जोडाविशी वाटली.
गुजराथी आणि मराठीतील नाटकांच्या कथावस्तु देखील अनेकवेळा समान असतात
पुलंचे " ती फुलराणी" आणि गुजराथी मधी "संतू रंगीली" ही दोन्ही नाटके पिग्मॅलीयन वर आधारीत आहेत. आत्रेंच्या मोरुची मावशी आनि गुजराथी "मनुनी मासी" यांचे विषय एकच आहेत.
" करायला गेलो एक" आणि गुजराथी " गुज्जु भाईये गाम गाजाव्या", मराटी नटसम्राट आणि गुजराथी अमारी दुनिया तमारी दुनिया , जागो मोहन प्यारे आणि गुजराथी पप्पु पास थई गयो , मराथी चूक भूल देणे घेणे आणि गुजराथी "जो जो वात बहार जाय नही" अशी एक ना अनेक नाटके गुजराथी आणि मराठीत समाईक उदाहरणे आहेत.
आई रीटायर होते हे गुजराथी मध्ये " बा रीटायर थाय छे" होऊन आले
या सर्वात गुजराथी आणि मराठी रसिकाना त्या नाटकातील पात्रे तितकीच आपल्या मातीतील वाटली.
आणि हीच गोष्ट आमच्या भाषा भले गुजराथी आणि मराठे अशा वेगवेगळ्या असतील पण आमची र्‍हदये एकाच तालात धडधड्तात हे सिद्ध करते.

Wednesday 27 April 2011

एप्रील फळ ७


मोघमपणे बोलायचे झाले तर एप्रिल महीना भारतिय कालगणने नुसार चैत्रा चा महीना .वर्षाचा पहीला महीना. नवे वर्ष तुम्हाला आरोग्याचे जावो असे केवळ म्हणुन निसर्ग थांबत नाही तर त्याच्या खजिन्यातली एकसे एक बढकर रत्ने तुम्हाला पेष करतो. नवीन कोवळी पालवी फुटली झाडे , फुलानी बहरलेले गुलमोहोर , जॅकरन्डा , बहावा, बकुळ , शिरिष , मोगरा ,बोगन वेल , लॅबर्नम , लाल ,केशरी , निळा, सोनेरी , हिरवट पांढरा रंगांची , गंधांची रेलचेल असते.
रस्त्याने जाताना गुलमोहराचे सडे पाहुन आपले वर्ष खरेच आनन्दाचे जाणार याची खात्रीच पटते.
असेच रमत गमत जात असलो तर मधेच एखादे फलांचे दुकान लक्ष्य वेधुन घेते. केवळ हारीने मांडलेली फळे हीच काय ती सजावट . रंगपंचमीच्या वेळी रंगानी नटलेले दुकाना असवे इतक्या विविध रंगांनी फळानी दुकान सजलेले असते.
हिरव्या पिवळ्या मोसंब्या , काळ्सर शेवाळी हिरवे कलींगड , पिवळे धमक आंबे , हिरवी गार द्राक्षे ,सोनेरी खरबूज , अन्जीरी गुलाबी अन्जीर , पांढर्यावर हिरवे पट्टे असलेली साखर काकडी .खाकी रंगाचे चिक्कू , आंब्याशी स्पर्धा करणारी पपई,लालभडक स्ट्रॉबेरी , जांभळे ,तुत्तु, रायण्या ,आंबोळया वगैरे माकड मेवा अजून यायचा असतो.या सार्या फळांच्या सोबत बसलेला फळवाल्याचा कळकट छोटा मुलगा सुद्धा या रंगसंगती मध्ये शोभुन दिसतो
ही सगळे फळे म्हणजे सम्राटांच्या दरबारातले मानकरी. सम्राटाला साजेल अशाच वेशात असतात. प्रत्येकाचा थाट काही औरच.
द्राक्षाचा बहर संपत आलेला असतो. मोत्यांची रास रचावी तशी द्रक्षांच्या घडाची रास पाहीली की आपण गर्भश्रीमन्त असल्यासरखे वाटु लागते,हिरवे गार द्रक्षाचे मणे, मधेच्य एखाद्या मण्यावर उन्हाने आलेली तांबुस झाक पाहीली की उन्हातुन चालल्यामुळे गोर्यापान युवतीच्या गालावर आलेली लाली आठवते.
माझ्या लाहनपणी द्राक्षे बीयांसहीत असायची. मोठीमोठी द्राक्षे आणि त्यात एखादे बी. चांगली टपोर्या जाम्भळाएवढी असायची द्राक्षे. सीडलेस द्राक्षे आली तेंव्हा ती या बीवाल्या द्राक्षांसमोर वामन बटु च दिसायची . आम्ही त्याना हिमगौरी च्या कथेतली सात बुटके म्हणायचो.
काही म्हणा द्राक्षे तेंव्हाही कधी आपल्या मातीतली वाटली नाहीत. ते फळ थोडे दुरावा राखुनच असते.फक्त थोड्या खस्ता खाउन वाळुन द्राक्षा बेदाणे होउन आल्या की त्या पाहुण्या वाटतात. थोडे जड जेवण झाले असावे . दुपारभर कोणीही छळायला येणार नसावे. हातात मस्त पैकी गुरुनाथ नाइक किंवा सुहास शिरवळकर कोणीतरी फुल्ल टाईमपास असे असावे . उजव्या हाताला गार वाळ्याच्या पाण्याचा पितळी लोटा. आणि डाव्या हाताला द्राक्षाचा घड .पुस्तकाचे पान उलटावे आणि द्राक्षाचा एकेक दाणा हळुच तोंडात जावा. काही वेळानन्तर अशी तन्द्री लागते ; डोळे या ईन्द्रियावर सिद्ध गुरुत्वकर्षण काम करत असते याची जाणीव होते डोळे सुस्तावतात. ब्र्हम्हानन्दी टाळी लागुनकेंव्हा झोप लागते तेच कळत नाही . दुपारी अडीच तीन ला डोळा लागतो तो सहा शिवाय उलगडत नाही. या दिवसात संध्याकाळे सहा वाजता देखील बर्यापैकी उजेड असतो . थोडेसे सकाळसारखे वातावरण असते त्यामुळे उजाडल्यासारखे वाटुन फसगत होते.
घरातले बाकी लोक हसायला लागले की कळते अरेच्च्या द्राक्षानी आपल्याला एप्रिल फूल केले की.....
द्राक्षे खाण्याची आणखी एक गंमत आहे. त्या घडातला एखादा सुट्टा मणी जो थोडासा मऊ झालेला असतो. एखादा जर्रा वाळलेला असतो. तोंडात टाकला की त्याला अशी जादुई चव आलेली असते सांगताच येत नाही. गोड आणि आंबट एकामागोमाग चव येतच रहाते.
द्राक्षाची ही तर्हा तर कलिंगडाची तर्हा आणखी वेगळीच . काही लोक त्याला टरबूज म्हणतात. म्हणु देत बिचारे पण कलिंगडाला टरबूज म्हणुन आपण त्याची बूज राखत नाही .
खरबूज , टरबूज , साखर काकडी, चिबूड हे सगळे एकाच वर्गातले विद्यार्थी.
प्रत्येकाचे काही वेगळे वैशिष्ठ्य. खरबूज कसे वाळूच्या सागरातुन थेट उचलून आणले आहे असे दिसते.खरबूजा चा मातकट सोनेरी रंग पटकन डोळ्यात भरत नाही. पण एकदा कापले की त्याच्या आतला गर्भरेशमी गाभा नजर बाजुला होउ देत नाही. खरबूजाचा करकरीत स्पर्श कडक कांजी केलेल्या खादीच्या नव्या लुगड्या सारखा करारी वाटतो.खरबूज जर गोल नसते तर ते बीकानेरच्या राजवाड्यातुन एखादे खांबावरचे शिल्प उचलुन आणले आहे असे भासले असते.
खरबूज पाहीले की मला रामनवमीची आठवण होते. लहानपणी आळीतल्या काळ्या रामाला रामनवमी ला रामनवरत्रात नऊ दिवस कार्यक्रमांची रेलचेल असायची. गीत रामायण ,प्रवचन , कीर्तन , रामरक्षा आणि सन्ध्याकाळी आरती. गावतले बरेच लोक रात्री आरतीला जमायचे. एरवी सामसूम असणार्या मन्दीरात त्या दिवसात एक प्रकारचे कसले तरी चैतन्य असायचे. आळीतले बरेचसे लोक बाहेर कोठेही गेले असले तरी रामनवमी चा उत्सवाला घरी यायचे.काही लोक गावात स्वत:चे घर नसले तर आळीतल्याच कोणाकडे तरी पाहुणे म्हणुन राहायचे.
एकमेकांची विचारपुस व्हायचे. कोण कोठे कोण कोठे आहे याची खबर बात मिळायची. जग हे एक ग्लोबल व्हीलेज आहे याची जाणीव व्हायची.
रात्री आरतीला सगळे एकत्र यायचे.आणि आपली आळी वसुधैव कुटुम्बकम आहे ही जाणीव मनात कोठेतरी घर करुन. आरती च्या नन्तर आफळे बुवांचे कीर्तन असायचे. ते नेताजी सुभाशचन्द्र बोस , रामदास , शिवाजी अशा विवीध विषयांवर कीर्तन करायचे.युवकाना प्रोत्साहन मिळेल अशा गोष्टी सांगायचे. कधी मोरोपन्तान्चे आख्यान ही लावायचे. आर्या दिन्ड्या साक्या यांचा अक्षरशः सुकाळ असायचा. रात्री बराच उशीरापर्यन्त कार्यक्रम चालायचे.कितीही झोप अनावर झालेली असली तरी आम्हा मुलाना मात्र नन्तर मिळणारा प्रसाद जाग्रुत ठेवायचा.
पपई , खरबूज , द्राक्षे , साखरकाकडी अशी नाना फळे त्या प्रसादात एकत्र झाले असायची. रामनवमी चा उत्साह जसा लोकाना जातपात वय ,हुद्दा सगळे विसरुन एकत्र आणयचा तसे हा प्रसादही. सर्व सामन्या पपई केळी मध्यम वर्गीय चिक्कु मखमली खरबूजा सोबत यायची. द्राक्षे त्या सगळ्या प्रसादातही अखंड राहुन आपले वेगळे आस्तित्व दाखवायची.
घरात सर्व प्रथम आणलेल्या खरबूजाला त्या रामाच्या प्रसादात वर्णी लागुन मान मिळायचा.
खरबूजाचे पन्हे हा एक अफलातुन प्रकार. साखर वेलदोडे घातलेले रेशमी भगव्या रंगाचे ते पन्हे तुमच्या मनात चाखताक्षणीच एक विलक्षण तृप्तीची जाणिव करुन देते. कितीही तळतळ्त्या उन्हातुन या एक वाटी पन्हे खा. जीव तृप्त होतो. जगातल्या कोणत्याही सॉफ्ट ड्रिन्क पेयाला ही सात्विक चव कधीच सापडणार नाही.
कलिंगडात हा सात्विक पणा जाउन एक बेरकीपणा आलेला असतो. वरुन काळेशार हिरवे कलिंगड आतुन भलतेच लाल असते. का कोणास ठाउक मला कलिंगड जुन्या चित्रपटातल्या शेट्ट्टीची आठवण करुन देते.स्वतः कलिंगड सुद्धा तसाच आब राखुन असते.
कलिंगड घरी आणण्याच्या दोन/तीन पद्धती आहेत्.एक म्हणजे कलिंगड थोडे कापुन म्हणजे चिर पाडुन आणायचे.फळवाला जणु खजिन्याच्या खोलीचे दार किलकिले करुन दाखवावे तसे आतला लाल खजिना हळुच दाखवतो.दुसरी पद्धत म्हणजे फळवाला कलिंगडाचा पिरॅमीड सारखा तुकडा कापतो तुम्हाला लाल भाग दाखवतो आणि जिग सॉ पझल असावे त्याप्रमाणे पुन्हा तो तुकडा जागेवर परफेक्ट बसवतो्आ तुकडा जे कापेल त्याला मिळायचा .तीसरी पद्धत म्हणजे आख्खे कलिंगड आणायचे न फोडता. फळवाल्या बागवानाकडुन माठ वाजवतो तसे वाजवुन आणयचे.लहानपणी घरात फ्रीज वगैरे काही नसायचे . ते आणलेले कलिंगड उन्हाने गरम झालेले असायचे.मग ते धप्पकन आंगणातल्या हौदात टाकायचे. जेवणे होइपर्यन्त ते हौदात गार करायलाठेवायचे.बाबांचे जेवण होइतो आम्ही भावंडे हौदात तरंगणार्या कलिंगडावर टपला मारत धबक धबक करत बसायचो. बाबा जेवण आटोपुन मागुन यायचे.आम्हाला एखादी टप्पल बसायची
आणि कलिंगड महाराज पाण्यातुन बाहेर यायचे.लहान बाळाला पुसावे तसे बाबा त्याला टॉवेलने पुसत. मोठे पातेले घेतले जाई.
परात घेतली जायची .कलिंगड परातीत स्थानपन्न व्हायचे. बाबा मग सुरीने कलिंगडाचे दोन भाग करायचे. आमचा डोळा त्या मधल्या स्पन्जा सारख्या गाभ्याकडे असायचे. बाबा तो तुकडा त्या दिवशी जो कोणी शहाण्यासारखा वागला असेल त्या भावंडाला द्यायचे.
बाहेरुन हिरवे गार दिसणारे कलिंगड आतुन एक वेगळेच रूप दाखवत असते. पाचुच्या तबकात एखदे माणीक चमकावे तसे हिरव्या पांढर्या जाड सालीच्या आत तो लाल भडक खजिना चमकत असतो.
एरव्ही हिरवा सिग्नल निघा . लाल सिग्नल थांबा . पिवळा केशरी सिग्नल थांबा वाट पाहुन जा असे आपल्याला शाळेत पाठ करुन घेतलेले असते. एप्रिल फळांच्या दुनियेत हे सगळे उलटे पालटे होउन जाते. आंब्याची राजवर्खी केशरी फोड पाहिल्यावर कोण कशाची आणि कशासाठी वाट बघेल? कलिंगडाचा लाल भडक गर पाहील्यावर थांबण्यापेक्षा तर उलट जोरात सुरु करा असेच त्याचे म्हणणे असते असे समजुन वागतात.
ही एप्रिल फळे खाण्याची प्रत्येकाची वेगळी पद्धत असते. द्राक्षे एकदम वीस्.तीस च्या संख्येने तोंडात बकणा भरली तर त्यांचा आतल्या आत बुकणा करायला मजा येते.
कलिंगडाचे करकरीत तुकडे काट्यावर धरुनते अगोदर ओठावर फिरवुन खायचे. अहाहा काय गार वाटते.
या कानापासुन त्या कानापर्यन्त पसरलेली आख्खी फोड खाताना लहान मुले तर नेहमीपेक्षा दुप्पट तिप्पट गोजिरवाणी वाटतात .
पपई एखाद्या साधु सारखी वैराग्य भावाने खाल्ली जाते. खरबूजाला पन्ह्याशिवाय स्वतन्त्र असे फारसे ओळखले जात नाही.
चिक्कु हे तसे फारसे मिजास नसलेले केळ्यानन्तर चे गरीब फळ.
काही फळे डोळ्याना सूख देतात्.काही जिभेला . अननसासारख्या काही फळांचा वासच मोहोवतो. तर अन्जीर खरबुजे सारख्या फळांचा स्पर्श पुन्हा पुन्हा घ्यावासा वाटतो.
आंबा खाण्याची माझी सर्वात आवडती पद्धत सांगतो.
मस्त पैकी केशरी पिवळा दिसणारा राजवर्खी हापुस घ्यावा. त्याच्या तलम सालीचा स्पर्श अनुभवावा. त्याचा घमघमाट नाकापासुन फूटभर अन्तरावरुनही येत असतो .टोकाकडुन आंब्याचे साल दाताने सोलावी. आंब्याची साल पूर्ण काढुन टाकावी. खाण्या अगोदर डोळे बन्द करुन तो गुळगुळीत स्पर्श ओठानी अनुभवावा.आणि आता कशाचीही वाट न पहात बसता आंबा एकेक तुकडा तोंडात घोळवत सम्पवुन टाकावा. आहाहा त्या स्पर्शाने , राजेशाही वासाने , तलम स्पर्शाने ,राजवर्खी केशरी दर्शनाने आणि ताँडात घोळवत खालेल्ल्या स्वर्गीय चवीने मन एकदम तृप्त होते . मनात कोठेतरी स्वर्गीय संगीत ऐकु येउ लागते.अंतरात्म्यालाही तृप्तीचा साक्षात्कार होतो.
नाक कान डोळे स्पर्श आणि जीभ या पन्चेन्द्रीयना तृप्तीचा अनुभव देउन खाणार्याला श्रीमन्त करणारा आंबा हा खराखुर्रा सम्राट शोभतो..

एप्रील फळ ६

आपल्या लहानपणच्या ब-याचशा आठवणी फ़ळांशी निगडीत असतात.लिची पेर पीच चेरी या पेक्षाही फ़णस चिक्कु पेरु आंबा बोरे चिंचा ही नेहमी दिसणारी आणि आपल्य इथल्या झाडांवर आढळणारी फ़ळे ती झाडे त्यावर खेळलेले खेळ हे सगळे आपले लहानपण घडवतात. जून सरता सरता फ़णसाचे आगमन होते. फ़णस म्हंटले की पटकन आठवतो तो पुलंचा अन्तू बर्वा.
कोकणातील माणसे फ़णसा सारखी असतात खूप पिकल्याशिवाय त्यांच्या गोडवा येत नाही म्हणतात. फ़णस आणि कोकण हे वेगळे करताताच येत नाही. पटकन सहजासहजी काही कोणाला मिळु द्यायचे नाही आणि दिले की भरभरुन द्यायचे हा कोकणीबाणा सुपारी;नारळा फ़णसाने कोकणी माणसाला दिला की कोकणी माणासाने त्याना दिला हे ठरवणे अवघड.राजकारण असो इतिहास असो किंवा अर्थकारण असो हा गुण सर्वत्र दिसतो.
दारातच स्वागताला उभे असणारे डेरेदार हिरवे; पानानी गच्च भरलेले फ़णसाचे झाड ही कोकणी कौलारू घरांची ओळखीची खूण. घरासमोर असणारा आड त्यावर कुर्र...की...च वाजणारा रहाट
एखादे सोनचाफ़्याचे सळसळते झाड वा-यावर मस्तीत डुलणारा झिपराड माड आणि लाल मातीतुन जाणारी पाउल वाट हे सगळे पाहिले की का कोणास ठाऊक स्वप्नामधील गावाला जाणारी वाट हीच असेल असे राहुन राहुन वाटते. आणि घराच्या दारातच एखादी सुरुकतलेली आजीबाई गालावर तळहात दुमडुन बोटे मोडत "पुता तू होड जातलो रे" म्हणत प्रेमाने आपले मस्त गूळ पाणी देउन स्वागत करणार असे हमखास वाटते. कोकणची खरी ओळख म्हणजे फ़णस. स्वत:च्या अंगाखांद्यावर फ़णसाची बाळे वागवणारे फ़णासाचे झाड मला नेहमीच जिवती मातेची आठवण करुन देते. मूल व्हावे म्हणुन आंगाखांद्यावर दहाबारे लहान बाळे वागवणा-या जिवती मातेला नवस बोलला जातो. त्या देवीचे चित्र मी कुठल्याशा पोथीत जेंव्हा पहिल्यांदा पाहिले तेंव्हा मला फ़णसाच्या झाडाचीच आठवण झाली होती. मी माझ्या आजीला तसे सांगितलेही होते त्यावर आजी माझ्या पाठेत एक चापटी मारुन "चल पळ" म्हणुन फ़िस्सकन हसली होती.
पण फ़णसाचे झाड जेंव्हा केंव्हा पहातो तेंव्हा मला हीच आठवण होते.
फ़णसाचे प्रेमी कट्टर असतात.त्यावरुन माणसांचे विभाजन करायचे झाले तर फ़णस मनापासुन आवडणारे आणि अजिबात न आवडणारे अशा दोनच प्रकारचे लोक असतात. अधलामधला प्रकार माझ्या पहाण्यात तरी नाही.फ़णस न आवडणा-या माणसाला फ़णसा वास सहन सुद्धा होत नाही आणि फ़णसप्रेमी माणसाला तो दरवळ जागेवरुन हलुसुद्धा देत नाही.
परवा पार्ल्याच्या बाजारातुन सहज जात होतो तेथे काचेच्या पेटीआड ठेवलेल्या तो ग-याचा खजीना पाहुन मी मंत्रमुग्ध झालो. अगोदरच त्या फ़णसाच्या दरवळाने मला जागेवर थोपवुन धरले होते. गरे पाहिल्यावर मी कोठे निघालो होतो तेच विसरलो आणि ग-यांच्या दिशेने आपोआप चालु लागलो. माझ्याबरोबरचा मित्र ; त्याला फ़णसाचा दरवळ म्हणजे वास वाटतो. तो त्याने हैराण झाला होता आणि मी मिटक्या मारत त्या करकरीत ग-यांचा आस्वाद घेत होतो.
माझ्या लहानपणी असे फ़णसाचे गरे बाजारात मिळायचे नाहीत. त्यासाठी आख्खा फ़णस आणावा लागायचा. फ़णस आणला म्हणजे तो मग दोन तीन दिवस ठेवायचा किनतानात झाकुन ठेवायचा आणि पिकल्यावर त्याचा दरवळ सगळ्या घरभर सुटायचा.फ़णस घरात आणला म्हणजे त्याला टेकुन बसणे ; त्यावर हात दाबुन तळहातावर काट्यांमुळे उमटणारे खड्डे मोजणे हे आम्हा मुलांचे उद्योग. त्यासाठी आम्ही अभ्यास देखील त्या फ़णसाच्या सान्निध्यात करायला तयार असू.
फ़णस पिकुन त्याचा दरवळ घरभर झाला की मग त्यानन्तर तो फ़णस कापण्याचा सोहळा सुरु व्हायचा. सोहळाच म्हणायचा तो. खोबरेल तेलाची वाटी तर्हेतर्हेच्या सू-या आणि दोन पराती पाअतेली घेउन माझे धाकटे काका फ़णस कापायला बसायचे. पूजेला जसे सोवळे नेसावे लागते तसे फ़णस कापण्यासाठी सुद्धा त्यांचा एक खास पायजमा असायचा. त्यावर किनतान टाकुन ते फ़णस कापायला बसत. शस्त्रास्त्रांना धार लावताना अगोदर पाणी लावतात तसे सूरीला खोबरेल तेल लावले जायचे. आणि मग ती सूरी फ़णसातून आरपार जायची. अर्ध्या कापलेल्या फ़णसाला मग ते काका नरसिंहाने हिरण्यकश्यपूचे पोट हातानी फ़ाडले असेल त्या श्टाईल मधे दोन हातानी फ़णस उकलायचे. आम्हा मुलाम्चे सगळे लक्श्य त्यातून डोकावणा-या त्या सोनेरी चंदेरी खजिन्याच्या मोहोरांच्या तुकड्यांकडे असायचे.फ़णस उकलल्यानन्तर त्यातुन गरे वेगळे काढले जात. घरातल्या देवाला दोनचार गरे दाखवुन मग ते सगळ्यानी खायचे हा शिरस्ता.फ़णसाचे गरे एका पातेल्यात ठेवले जायचे सुरवाती सुरवातीला तर गरे पतेल्यात पडायच्या आतच ते पोटात पडायचे. दुस-या पातेल्यात नुस्त्या बीयाच असायच्या.नन्तर नन्तर तर आख्खे गरे संपल्यावर अगदी गरे असलेल्या रेशा सुद्धा शोधुन खाल्या जायच्या
आई; थोरली काकु; आत्या वगैरे महिला मंडळ " अरे गरे खाऊ नका पोट फ़ुगेल"वगैरे पोकळ सल्ले द्यायच्या पण आम्ही त्याला अजिबात दाद द्यायचो नाही.उलट "शाळेत कालच ;गरे खा गरे पोटाला बरे" हे बडबडगीत शिकलो आहोत ते काय उगाच" असे म्हणुन दाखवायचो. " शिवाजी महराजानी अफ़्जलखानाचे पोट फ़ाडुन त्याचा कोथळा बाहेर काढला" हे प्रताप गडाच्या लढाईचे वर्णन वाचताना महाराजानी त्याची प्रॆक्टीस फ़णसावर केली असावी असे उगीचच वाटुन जायचे.
फ़णसात दोन प्रकार काप्या आणि बरक्या.यातले कोणत्या झाडाला कोणते फ़ळ लागेल ते कोणीच सागु शकायचे नाही. आमच्या गावात भोरकर वाडा म्हणुन एक जुना वाडा होता तेथे फ़णसाची दोनतीन मोठी झाडे होती. मोसमात नेहमीच या झाडाना फ़णस लगडलेले असायचे.घरी फ़णस आणायचा तर त्या झाडावरचा एखादा फ़णस बूक करावा लागायचा त्या फ़णसावर अक्षरश: ज्याने तो फ़णस बूक केलेला आहे त्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या डकवल्या जात. मला फ़णसानी लगडलेले ते झाड बघायला खूप आवडायचे झाडावर लगडलेला फ़णस हातानी चाचपडुन बघण्यातली गम्मत काही वेगळीच.एव्हढे मोठे फ़ळ झाडावर पहायल काहितेरी वेगळेच वाटायचे."अबबबबबबब केवढा फ़णस आई; आजोबांचे पोटसुद्धा एवढे मोट्ठे नाही " या पाडगावकरांच्या गाण्या ची खरी गम्मत तो मोठा फ़णस पाहिल्यावर कळायची.
फ़णसावर थापट्या मारुन तो काप्या की बरका ते ठरवले जायचे.त्यावर थाप मारुन येणार्या ठप्प ठप्प किंवा थब्ब थब्ब आवाजावरुन ते कळायचे. देशावरच्या माणसाला काप्या फ़णस आवडतो तर अस्सल कोकणी माणसाला बरक्या.
काप्या फ़णसाचे गरे देशावरच्या घाटी माणसासारखेच फ़ारसे अंगाला लावुन न घेणारे; सुट्टे सुट्टे, करकरीत, थोडे कमी गोड असतात तर बरक्या फ़णसाचे गरे कोकणी माणसा सारखेच गोडीत अवीट ; पण हातात धरु म्हणता सुळ्ळकन हातातुन निसटुन खाणाराची फ़जीती करणारे.
फ़णासाचे गरे आयुर्वेदात रुचकर ; पौष्टीक असे काहीसे वर्णीले आहेत. पण खाणारा माणुस फ़णसाचे गरा तोंडात टाकतो तेंव्हा अजानतेपनी डोळे मिटतो. वाईन टेस्टरने वाईन तोंडात घोळवत त्याची लज्जत चाखावी तसे काहिसे गर्याची चव तोंडात घोळवतो दोन क्षण का होईना त्याची अक्षरश: ब्रम्हानन्दी टाळी लागते. अंतरात्मा तृप्त होतो.आणि हतिम बीन ताई च्या गोष्टीत सांगितलेल्या प्रमाणे "एकबार देखा है दूसरी बार देखने की चाहत है" या उक्तीनुसार आणखी एकदा ती तृप्ती अनुभवावी म्हणुन दुसरा गरा उचलण्यासाठी त्याचा हात दुस-या कोणाचेतरी नियंत्रण असावे त्याप्रमाणे हात गरे ठेवलेल्या भांड्याकडे आपोआप वळतो..

एप्रील फळ ५

कुल्फ़ीवाला जातो ना जातो तोच दुसरा एक आवाज येतो..........हे काळी मैना काळी मैना डोंगरची काळी मैना......
मुले याची वाटच बघत असतात. काळीशार करवंदे....निरागस पण अवखळ लहान मुलाच्या खट्याळ डोळ्यांची आठवण व्हावी असेच ती पाटीत ठेवलेली मण्यांसारखी करवंदे पाहुन वाटते.
किंचित आंबट आणि गोड अशी चव...नुसती सांगुन कलणार नाही ती चाखायलाच हवीत. करवंदे चाखताना ती लाल की पांढरी आहेत त्या वरुन चिमणी आहेत की कावळा आहेत हे ठरवायचो. ज्याला जास्त कावळे तो त्या दिवशी जिंकला असे आम्हाला वाटायचे.
करवंदे खाताना एक गम्मत असते...करवंदे खावीत तर गच्चीत बसुन नाहीतर घराच्या कट्ट्यावर बसुन....करवंद हे फ़ळ सोफ़्यावर बसुन सगळे शिष्ठाचार पाळुन खाण्याचे नव्हेच. ते चाखत माखतच खायचे असते. करवंदांच्या फ़्यामिलीत जमा होईल असा चण्यामण्या नावाचा बोरांचा एक प्रकार असतो. नुसते नाव काढले तरी जिभेला पाणी सुटते. लालसर केशरी बारीक मोत्या सारखी दिसणारी किंचीत सुरकुतलेली ती फ़ळे इतकी आंबट असतात की भल्याभल्यांच्या तोंडाला पाणी आणतात. त्याला मिठाची जोड असेल तर काय विचारु नका.
पण ती सुद्धा खायची एक पद्धत आहे. कागदाचा त्रिकोनी द्रोण करुन त्यात अंदाज लागणार नाहीत इतकी चन्यामन्या बोरे त्यात भरायची आणि रस्त्याने रमतगमत जात खायची. आंबटपणामुळे जीभ जास्त वेळा  टॉsssक्क करते की डोळे जास्त वेळा मिचकावले जातात अशी स्पर्धा सुरु असते.
करवंदे इतकी आंबट नसतात. पण ती त्यांच्या जादूई चवीमुळे वेड लावतात हे मात्र नक्की.
करवंदे एकेक करुन चाखत माखत खाणे आणि एकदम त्यांचा बकणा भरणे ...हे दोन्ही प्रकार अजबच आनन्द देतात. एकेक करवंद जिभेवर घोळवत खायचे.आणि दहाबारा करवंदे एकदम चावायची मजा वेगळीच. करवंदांच्या बिया चावताना च्युईंगम खाल्ल्याचेही सूख मिळते.
करवंदांबरोबरच येतात ती जांभळे.आमच्या गावात जवळच एक जांभळाचे जंगल आहे. बघावे तिकडे जांभळाचीच झाडे. अक्षरश: झोपुन तोडता येतील इतक्या खाली वाकलेल्या फ़ांद्याम्वर असतात जांभळे .
तेथे  छोटी जाम्भळे मिळतात. साल आणि बी यात अंतर फ़ारसे नसते. गर वगैरे चैन नसते.
पण ही जांभळे चवीत मात्र लाखात एक. खाताना असेच हवे तसेच हवे अशी उगाच मिजास नसते. जे मिळेल त्या भांड्यात घेउन खावी. न मिळाल्यास ओंजळीत घेउन खावी. हां पण एक आहे जेथे रस्ता जवळ असेल अशाच जागेवर बसुन / उभे राहुन खावी. लहानपणी आम्ही भावंडे ही जांभळे घराच्या खिडकीत उभे राहुन खायचो.आणि बीया जोरात रस्त्यावर उडवायचो. तोंडाने उडवुन कोणाची बी जास्त लाम्ब जाईल ते पहायचो.
दुसरी जांभळे असतात ती जरा जाड खात्यापित्या घरची. त्याना गर असतो. आम्बटपणा कमी असतो पण गोडवाही कमी असतो. ही जाम्भळे खाताना साल दातानी सोलुन आतला पांढरा नीळा गर उगाचच टिनोपालच्या जहिरातीची आठवण करुन देतात.
जाम्भळे ,करवंदे, डहाणु घोलवडकडे मिळणारे पाण्याच्या चवीचे जाम. ही सारे असतात कोकणचा मेवा त्याना आंब्याइतके कोणी फ़ारसे ओळखत ही नाही. पण ज्याना ती माहित आहेत त्याना ते कोठेही असो प्रत्येक मोसमात या मेव्याची हटकुन आठवण होतेच.
मला वाटते या सगळ्या चवींचा आपल्या प्रत्येकाच्या लहानपणाशी खूप घनिष्ठ सम्बन्ध आहे. जांभळे करवंदे खाताना आपण पुन्हा ते लहानपण अनुभवत असतो..

एप्रील फळ ४

मे संपता संपता पावसाची चाहुल लागते.आकाशात वारंवार नजरा जाऊ लागतात. आई वहिनी आत्या वगैरे महिला वर्ग लोणचे करणे आम्बोळ्या कुरडया, पापड सालपापडाचे वाळवण इत्यादी बेगमीच्या कामात मग्न असतात. मुलानाही शाळेचे वेध लागलेले असतात. सूट्टी संपता संपत नसते लोळत पडण्याचाही कंटाळा आलेला असतो. पत्ते , बुद्धीबळे , कॆरम अस्ताव्यस्त विखुरलेले असतात.
काय करावे हा मोठाच प्रश्न असतो. आईला वाळवण घालायच्या कामात मदत करायला परवानगी नसते. ती करताना काम कमी आणि खादाडी जास्त असते हे आईही ओळखुन असते.
अशात एकदम दूरून एक मस्त आरोळी ऐकु येते...........आssssssssssल्फ़ीये कुल्फ़ी मलाsssssssय. कुल्फ़ी मलैssssssय.
पाउल जागच्या जागी थबकते. कंटाळ्यामुळे बधीर झालेले डोके एकदम चालु लागते.खीडकीतुन कुल्फ़ीवाला कुठे दिसतो याचा अंदाज घेत प्यान्टचे खिसे , टेबलाचे ड्रॊवर , पेन स्टेन्ड , गादीखाली , उशीच्या अभ्र्यात असे ठेवणीच्या गुप्त जागेत लपवलेले चिल्लर धन बाहेर येउ लागते. डोक्यावर माठ ठेवलेला कुल्फ़ीवाला दिसला की अक्षरश: भक्ताला देव भेटल्याचा आनन्द होतो.
आसपासच्या दोनचार खिडक्यातुन ओ कुल्फ़ी......थांबा अशा हाका ऐकु येतात.आणि मुले घराबाहेर पळ काधतात. घराच्या दारात्च कुल्फ़ीवाला त्याची ती माठ असलेले बाम्बुची टोपली अलगद उतरवुन ठेवतो तेंव्हा त्याचा थाट पहाण्यासारखा असतो. त्या्चा तो मिठाच्या बर्फ़ाने भरले्ला माठ. एखाद्या खालसा संस्थानाच्या कारभा-याने संस्थानचा खजी्ना दाखवावा तसा तो अलगद माठावरचे कापड बाजुला करतो त्यात बर्फ़ाच्या पाण्यात तरंगणा-या कुल्फ़ीच्या लोखंडी साचाच्या  डब्या मुले अगदी अधाशीपणे  पहात असतात.कुल्फ़ीचा साचा धरण्याची ती ढब . साचाच्या डबीवरील ते कणकेचे सील नखाने बाजुला काढले जाते.मुलांची उत्सुकता शीगेला पोहचलेली असते. साच्याचे डबीचे झाकण मोकळे होते . ती शंकु च्या आकाराची काळपट डबी तिरकी धरुन गुढग्यावर मूठ आपटत त्यातुन पांढरी शुभ्र कुलफ़ी बाहेर काढली जाते. बाहेर येणा-या कुल्फ़ीबरोबर पहाणाराचे डोळे विस्फ़ारत जातात.
अखेर शेवटी ती कुल्फ़ी वडाच्या पानावर आडवी ठेवुन चाकुने तीचे काप होऊन जेंव्हा ते वडाचे पान कुल्फ़ी सहीत हातात पडते तेंव्हा मनात कुल्फ़ीशिवाय दुसरा कोणताही विचार येत नाही.
इतकी एकाग्रता जर कोणी देवधर्मात प्रार्थनेत दाखवली तर देव ती प्रार्थना संपायच्या आतच प्रसन्न होऊन दर्शन देईल. वडाच्या हिरव्यागार पानावर ठेवलेले ते कुल्फ़ीचे पांढरे शुभ्र काप पहात रहावे असे वाटत असतानाच जीभ डोळ्यांवर आक्रमण करते आणि बघताबघता कुल्फ़ी तोंडात विरघळुन जाते.एकच कुल्फ़ी  खाउन थांबला असे जर कुणाच्या बबतीत झाले असेल तर तो मनुष्य हा जितेंद्रिय पदाला पोहोचलेलाच असला पाहिजे. हळुहळु त्या कुल्फ़ीवाल्या जवळ गर्दी जमते. मघाशी त्या पापडकुरडया जवळ फ़िरकु न देणा-या आयाबाया ती कामे सोडुन कुल्फ़ीच्या खजिन्या भोवती गोळा होतात. कुल्फ़ीवाल्याच्या माठातुन शेवटीशेवटी शोधुन शोधुन कुल्फ़्या काढल्या जातात. माठातल्या कुल्फ़्या संपल्या की मगच कुल्फ़ीवल्याला जाऊ दिले जाते.

एप्रील फळ ३

बाजारात आता आंबा महोत्सव् चालु असतो. प्रत्येक जण् आंब्यांचे काही ना काही करत असतो पिकलेल्या हापुसआंब्याचा मोरांबा ही खास पाककृती वर्तमान पत्रात् झळकते. घरात् घरात् त्यावर् प्रयोग् होतात साखर् आंबा गुळांबा केला बरण्यात् भरला जातो.
आंबे असतात् तरी कैर्या येतच् असतात्. आता मात्र त्या खास लोणच्या साठी येत् असतात्. एकदम कडक् आणि बिन वासाच्या ही त्यांची पहीली पारख. घरात माळावर् अडगळीत पडलेले खास कैरी फ़ोडण्यासाठी बनवलेले अडकित्त्ते घासून् पुसून् लखलखत बाहेर येतात्.खड्डा असलेल्या पाटावर् सोललेली पांढरी कैरी व्यवस्थित् बसते. एका घावात् दोन तुकडे होतात. बघता बघता कैरी च्या तुकड्यांचा ढीग् होतो. त्याना बरणीत् हळद् मिठाचे स्नान् घालुन् मुरवत ठेवतात. अंगाला चांगली हळद लागली की त्यावर् फ़ेणलेली मोहोरी ,तेल् ,मसाला, फ़ोडणी, यांचा अभिषेक केला जातो. एवढे सगळे झाले की फ़क्त् कैरीच्या लोणच्याच् हक्क असलेल्या केवळ् त्याच एका कारणासाठी बनवलेल्या चिनी मातीच्या पांढर्या तपकिरी गोल बरण्या जमिनीवर् येतात्.आणि हळदी , मसाल्याचा साज चढविलेल्या कैर्या पडदानशीन् होतात.कैरी च्या या देखण्या खानदानी तुकड्याना दृष्ट् लागु नये. बाहेरचे असंस्कृत् वारेसुद्धा लागु नये म्हणुन् बरण्या फ़डकी लाउन् पुरेपुर् बंदोबस्तात् पुन्हा फ़डताळात् रवाना होतात. या खजिन्यावर् मुलांचा डोळा असतोच्. आजी ते ओळखुन् असते. ती हळुच् मुलाना एकेक् फ़ोड् देते. बाठीच्या जवळचा कडक तुकडा ज्याला मिळतो तो आपल्याला स्पेश्यल् ट्रीटमेन्ट मिळाली आपण् आजीचे लाडके या आनन्दात् असतो. या फ़ोडीवरचा मसाला नळाखाली धुवुन् नुसत्या हळदी मिठात् मुरलेल्या फ़ोडी खाणे यात स्वर्गीय आनन्द्. ज्याने चाखले त्यालाच हे ब्रम्हरहस्य ठाउक..
एरवी खास असणारा आमरस् आता अगदीच् आम झालेला असतो. मुबलक् झाला तरी तो आपला आब राखुन असतो. आंबा पोळी , आंबा वडी हे प्रयोग् चालुच् असतात्. ताटलीला तूपाचा हात् लावुन् त्यावर् आमरसाचा पातळ् थर या रोपात् आमरस् उन्हात् बसतो. मुलांच्या तावडीतुन् सुटलेली आंबा पोळी हे आंब्याचे आणखी लोभस रूप्. गोल तलम गुळगुळीत् आंबापोळी आंब्याचे सारे गुण् घेउन् पुन्हा अवतरते.आंब्याच्या रसाचे आटवण हे आंब्याची वर्षभर आठवण् ताजी करायची गुप्त् युक्ती. सुंभ जळला तरी पीळ जळत् नाही तसे मोसम संपला तरी आम्र पुराण् काही संपत येत् नाही. बर्फ़ी आईस्क्रीम् सरबत् अशा नाना प्रकाराने आंबा भेटीला येतच् रहातो.
आंब्याचे होणारे हे कौतुक् बघुन् साक्षात भगवंताला ही "मासानाम मार्गशीर्षोहम्" च्या पुढे जावुन् "फ़लानाम आम्रोस्मीन " असेच् म्हणावेसे वाटेल.

एप्रील फळ १

एप्रिल फळ.......... हो एप्रिल फळ च
हे कळ फलकामुळे झाले नाही
मला एप्रिल फळ असेच म्हणायचे आहे
एप्रिल महीना म्हणजे वसंत आगमन........सर्वत्र फुलांचे सडे असतात्.नुकत्याच आलेल्या कोवळ्या पालवीमुळे झाडे रंगीबेरंगी झालेली असतात. प्रत्येक झाड जणु यजमान होउन वसंताचे स्वागत करतोय अशा मूड मधे असते. कोठे कोठे कोकीळा मजेत गात असते. अंब्याच्या मोहोराचे आता कैर्या रुपांतर होउन त्या हवेत मस्त झोके घेत असतात. त्यांच्या कडे असे लटकताना पाहीले की वाटते देवळ्यातल्या घण्टेचे लोलक काढुन हवेत अदृश्य घण्टा वाजवुनसारी सृष्टी या ऋतुंच्या राजाला सलामी देत आहे.
किंची त लालसर सोनेरी पानात दडलेली ती कैरी.....मरणोन्मुख मनाला ही अल्लड लहानपण आठवुन देते. ती शान काही औरच.
झाडावरची थोडीशी उबदार गरम कैरी ज्याने घरातुन चोरुन आणलेल्या तिखटामिठाच्या पुडीबरोबर खाली नाही तो माणूस कधीजगलाच नाही.
आंब्याचे जेवढे लाड होत नसतील तेवढे कैरीचे होतात......
शिवरात्रीलाच त्या कैरी बाळांची चाहुल लागते.....मोहोराच्या फुलांच्या ममधोमध  दडलेली ती छोटीछोटी बाळे टपोरी मोत्यापेक्षाही गोड दिसतात............. ...आंब्याच्या झाडाचेही पहिलटकरीणी सारखी डोहाळे पुरवले जातात.
खते दिली जातात .....मग फवारणी केली जाते...गारा लागु नयेत म्हणुन पानांचा आडोसा केला जातो...द्रुष्ट लागु नये म्हणुन काळ्या बाहुल्या बांधल्या जातात्.....लिम्बु उतरले जाते.... कोणी धटिंगणाने दगड मारु नये म्हणुम जागता पहरा बसतो.....
दिसामासाने कैरी बाळे मोठी होतात.... षोडशेच्या गालावर तारुण्याने गुलाबी झाक यावी तशी कैरी बाळांच्या गालावर लाली चढु लागते....एका दैवी मुहुर्तावर कैरी बाळाला स्वतःच्या नव्हाळीची जाणीव होते.......प्रौढत्वाच्या परिपक्वपणाची गोडी अजून आलेली नसते...आणी बालपणाचा अवखळ आंबटपणा संपलेला नसतो...अशा अल्लड आंबट गोड पाडाच्या कैर्याना हलकेच झेल्याचा पाळणा करुन झाडावरुन उतरवले जाते...... त्यांच्या साठी मस्त गवताची उबदार दुलइ अंथरली जाते......त्यावर त्याना जाग न येईल ईतक्या हलकेच धक्का न लावता नाजुकपणे झोपवले जाते....पुन्हा त्यावर उबदार गवताचे पांघरुण घातले जाते......
घरातल्या ताइ दादाने बाळाला उठवु नये म्हणुन सगळ्य मोठ्यांचा सक्त पहारा बसतो......
सगळ्यांच्या बोलण्यातले इतर विषय संपतात्.......फक्त कैरी आणि कैरी......घरात .....आळीत्..गावात एकच विषय्........कैरी.... आणि कैरीच.
कोणाच्या घरी जा..........रस्त्यात कोणाला भेटा. वनवासानन्तर रामाच्या च्या आगमना बद्दल अयोध्येत उत्सुकता असेल त्या उत्सुकतेशीच तुलना होउ शकेल तशी उत्सुकता कैरी च्या येण्याची असते. वर्तमान पत्रात रकाने च्या रकाने भरुन येउ लागतात्....एखादी वळवाची सर आली की भिजलेले डोके पुसल्यानन्तरचा डोक्यात येणारा पहिला विचार असतो कैरी आणि आंब्यांचाच्..एरवी आंब्याच्या झाडाकडे मुलाना फिरकु न देणारे मोठे एकदम उदार होतात आणि पडलेल्या कैर्या धुंडाळण्याच्या मोहीमेवर छोट्याना पाठवतात.
छोटे सुद्धा नाचत नाचत या मोहीमेवर येतात्.....अगदी तोरणा सर केल्याच्या आवेशात आणलेला तुट्क्या फुट्क्या कैर्यांचा ढिगारा मिरवत आणतात्....या कैर्यांवर हक्क फक्त त्यांचा असतो....त्यांचे काय करायचे हे सर्वस्वी त्यानी ठरवायचे असते.

कधी नव्हे ते मिळालेले स्वातन्त्र्य भरपुर उपभोगुन घेतले जाते. फुट्क्या कैर्यांचे फुटीच्या प्रमाणानुसार वाटे केले जातात...
चांगल्या कमी फूटलेल्या कैर्या मोठ्या ताई कडे जातात्...ती कैर्या धुते. त्यांचे बारीक बारीक चौकोनी तुकडे करते....त्याना बर्यापैकी मोठ्या पातेल्यात किंवा तांब्यात घेउन त्यात मीठ साखर टाकली जाते....त्यावर मेतकूट आणि नक्षी पेरावी तशी कोथिम्बीर पेरली जाते....
पातेले ताटलीने झाकुन मग ते नवरात्रात घागर फुंकताना झेलावी तसे हलवले जाते......आतापर्यन्त मोठ्यांच्या ही तोंडाला पाणी सुटलेले असते.......
आई मग छान चिवडा करते.....फुटलेल्या छोट्या कैर्या थेट चिवड्यात रवाना होतात्....पातळ पोह्यांच्या चिवड्याबरोबर चाखत माखत खाल्लेल्या करीची चव्..............आहाहा अगदी स्वर्गातला इन्द्राला दुर्लभ्...........एखाद्याला त्यावेळी विचारले की अमृताच्या बदल्यात हे कैरी वाले पोहे देतोस का? तर १०००% सांगतो तो " अजिबात नाही "असेच सांगेल.
थोड्या लहान कैर्यांचा ताबा आई घेते..
मिक्सर मधे वाटुन ती त्याची फर्मास चटणी बनवते.....ती उद्याच्या हळदीकुंकुवासाठी खास राखुन ठेवते..........फिकट हिरव्या रंगाच्या चटणी ने भरलेले काचेचा वाडगा पाहुन आई उगाचच क्रुतक्रुत्य होते.... त्याच रंगाचा शालु ती उद्यासाठी काढुन ठेवते. पडलेल्या कैर्यांसोबत आंब्याच्या डहाळ्या आलेल्या असतातच...... आई घरातल्या छोट्याना मग आंब्याचे तोरण करायचे मोठ्या जबाबदारीचे काम देते.....फडताळतुन सुतळ्या चे तुकडे निघतात....आंब्याची पाने स्वच्छ पुसली जातात्.. एकसारखी पाने घेउन त्यांचे देठ दुमडुन तो पानातुन आरपार केला जातो...मोठ्या ऐटीत आंब्याचे पान न पान तोरणात विराजमान होते....
संध्याकाळी घरातले सगळे जेवताना एकत्र येतात्.....दुपारी मीठ मेतकुट वापरुन केलीली कैर्यांची आंबोळी आता थोडी रस्सेदार झालेली असते.....पानापानात ती पंचपक्वनाच्या दिमाखात स्थानापन्न होते.....बाबा एका बोटानेच त्याची चव बघतात्....सगळे एकमेकांकडे पहात असतात्....बाबा थोडावेळ काहीच बोलत नाहीत्...शांतता पसरते आणि बाबा तोंडने एकदम फास्टर फेणेच्या ष्टाईलमध्य टॉsssक्क करतात्..........
महाराज गडावर पोहोचल्याच्या तोफांचा तो इशारा असतो.
छोटे एकदम खुशीत येतात. कैर्यांचा गड सर झालेला असतो