Wednesday 14 September 2011

धूपगंध

किती दिवस झाले आपण आपल्याला पाहून.
मला वाटते एक दोन महीने झाले असतील.
या पाय हल्ली थकलेत. डोळे दमलेत. आणि आरशात काय पहाणार तोंडाचे बोलके....
अन कुणाला आहे कौतूक त्या थोबाडाचे. दाढीचे खुंट , आत गेलेली गालफाडे , अन फिकुटलेले डोळे!
हम..वय झालं असं म्हणायलाच हवं.
आबा स्वतःशीच बोलत असतात. एकलेपणा त्याना खायला उठतो. भिरभिर फिरत असुनसुद्धा खोलीतला हॉस्पीटलचा वास काही कमी होत नाही. घरातल्या घरात असूनही औषधे ,काढे, इंजेक्षने यामुळे घरात हॉस्पीटलच झाले होते.
खरच आपण थकलोय...आपले वय झालय.....
पण शरीर थकले म्हणून वय झालं? आपला आवाज तर खणखणीत आहे. तो तरी तसा आहे हे कशावरून?
गायला जमेल? काळी दोन चा आवाज उतरून एखादी पट्टी उतरला असेल.
गाण्याच्या आठवणीने आबाना काहीतरी वेगळे वाटले. अंगात उगाचच वीज चमकून गेल्यासारखे झाले.
अंग अंग मोहोरून आले.
आबानी टेबलाकडे पाहीले. मघाशी शंभूनाथने त्यांची जुनी ट्रंक लॉफ्टवरून काढून तिथे ठेवली होती.
त्याला पितळी कुलूप तसेच होते.औरंगाबादच्या प्रयोगाला ती मिळाली होती ती ट्रंक. कोण्या अनामीक चाहत्याने दिली होती.
आबानी आपले थरथरते हात ट्रंकेवरुन , कुलुपावरून मायेने फिरवले. कुलुपाला थोडेसे ओढले असेल खटकन उघडले. उघडेच असेल कदाचित.
कर्र आवाज करत ट्रंकचे झाकण उघडले. ट्रंकेतून येणार्‍या शालूच्या वासाने आबा एकदम वेगळ्याच काळात गेले.
ट्रंक उघडली आतील जुनात शालूवरून आबानी हात फिरवला. मन एकदम मोरपिशी हसले.
त्यांच्या मनात अचानक वेगळाच काळ जागा झाला.
प्रेक्षकगृहात लोकांची लगबग सुरू झाली. सुरंगीच्या वेण्या , नवे कोरे शालु , पैठण्या , केवड्याची ,गुलाबाची अत्तरे , चंदनाची पावडरचा ,मोगर्‍याचे गजरे या सर्वांचा एकत्रीत वास येवू लागला.
सोडेवाले लेमनवाले यांचे आवाज येवू लागले.संध्याकाळी प्रेक्षकगृहात शिंपडलेल्या पाण्याने मातीचा सुगंध वातावरणात आणखीच रंग भरत होता.
बांगड्यांची किणकीण , एखाद्या कोपर्‍यातून येणारी हास्याची नाजूक लकेर , दबक्या आवाजातील कुजबूज ..........घणघण घणघण ...घंटेच्या एका आवाजाने हे सगळे आवाज शांत होऊ लागतात.
आवाज कमी होउ लागले तसे प्रेक्षकगृह जिवंत होऊ लागते.वातावर एका अनामिक उत्कंठेने भरुन जाते.
लोक डोळ्यात प्राण आणून पडद्याकडे पाहू लागतात.
पडद्यामागची हालचाल जाणवू लागते.पडद्यामागचे आवाज ऐकून अंदाज बांधायचा प्रयत्न करू लागतात
सागळी गात्रे आतूर होऊन नटाची वाट पहात असतात. त्या मखमली पडद्यामागे एक वेगळीच दुनीया जिवंत होत असते.
इकडे धुपाचा गंध उत्कंठा वाढवत असतो. शालू ,शेले यांची येजा आता थोडी निवत असते. आर्गनवाले तबले वाले ठाठोक करून हत्यारे लावत असतात,
पडद्यामागे हालचाल होते. घणणणणण घंटा निनादते. माईक जिवंत होतो
आर्गनचे सूर बोलू लागतात. घर्रर्रर्रर्रर्र आवाजासरशी पडदा वर जातो.
रंगमंचावर सगळी पात्रे समोर हात जोडून उभी असतात
आणि खणखणीत आवाजात नांदी सुरू होते.
" नमन नटवरा विस्मयकारा.... "

Sunday 31 July 2011

१८५७ अ हेरीटेज वॉक (४)

उपासमार पाउस आणि सैन्यातील बेदीली ( बख्त खानाला सेनापती मानायला हिंदू सैनीक तयार नव्हते) या मुळे स्वातन्त्र्य लढा देणार्‍या सैन्याला हार पत्करावी लागली होती. त्यांचे मनोधैर्य अधीकच खचले.
१८५७ च्या दिल्लीच्या लढाईत नजफगडची लढाई हा ब्रीटीश सैन्याचा पहीला मोठा विजय होता. या मुळे ब्रीटीशांचे मनोधैर्य उंचावले गेले.
ही घटना दिल्लीतील १८५७ च्या घडामोडीत टर्निंग पॉईन्ट मानता येईल. या लढाईचे आणखी एक महत्व म्हणजे असे की पंजाबहून येताना ब्रीगेडीयर जॉन निकोल्सन ने स्वतःसोबत आणलेले सीज मशिनरी. कोणतीही तटबंदी उडवून लावणारी यंत्रणा. यात६०० गाड्या भरून आणलेला दारुगोळा २४ पौंडी आणि १८ पौंडी गोळे फेकणार्‍या तोफा तसेच ८ इंची गोळे फेकणार्‍या उखळी तोफा.
प्राथमिक तयारी म्हणून निकोल्सन ने ६ आणि ७ सप्टेंबरलाच एक तुकडी तोफांसहीत रीज मध्ये तैनात केली. या तुकडीने मोरी गेटजवळ तोफांचा मारा चालू केला. बंडखोर ( भारतीय क्रान्तीकारक) इथे चकले त्याना वाटले की हल्ला या दिशेनेच होणार आहे
दुसरी तुकडी कश्मिरी गेटच्या रोखाने सिव्हील लाईन्स मध्ये तैनात केली. या तुकडीने कश्मिरी गेट जवळ ११ सप्टेंबर रोजी लढाई छेडली.
तिसरी तुकडी ओल्ड कस्टम हाऊस जवल तैनात केली. चौथी तुकडी उखळी तोफा घेवून खुदीसा बाग जवळ तैनात केली.१४ सप्टेंबर रोजी निकराचा हल्ला करायचा असे ठरले त्यानुसार निकोलस ने तीन छोट्या तुकड्या खुदीसाबाग च्या आसपास आणल्या. खुदीसाबाग मध्ये बादशहाचे उन्हाळी निवासस्थान होते. दुसर्‍या तुकडीने कश्मिरी गेट च्या भिंतीवर हल्ला चढवला. गनपावडर आणि वाळूच्या पिशव्या लावून त्यानी स्फोट घडवला यात कश्मिरी गेटच्या भिंतीचा काही भाग पडला.
1
दरम्यान जी तुकडी किशनगंजच्या बाजूने ( काबूल गेट) लढत होती त्या तुकडीचा कमाम्डर मेजर रीड जखमी झाला. बंडखोरानी त्याचा पाठलाग केला आणि त्या तुकडीतील ब्रीटीश फौजेला पळ काढावा लागला. निकोलसन हा मात्र शहर ताब्यात घ्यायचे या इर्ष्येने पेटला होता त्याने एका गल्लीतून काबूल गेट वर पुन्हा हल्ला चढवला. या वेळेस बंडखोरांकडे किल्ल्याच्या भिंतीवरील महत्वाची ठाणी होती. तेथे त्यानी बंदूका देखील तैनात केल्या होत्या त्यानी गल्लीतून येणार्‍या ब्रीटीश शिपायांवर हल्ला चढवला. यात खूप ब्रीटीश सैनीक जखमी झाले. स्वतः निकोल्सन सुद्धा जबर जखमी झाला. जवळजवळ ११७० सैनीक जखमी झाले होते.
यावेळेस आर्कडेल विलसन ने सैनीकाना तात्पुरती माघार घेण्याचे तसेच जवळच्या चर्चचा आसरा घेण्याचेआदेश दिले. ते ऐकताच अक्षरशः मरणासन्न अवस्थेतील निकोलसनने विलसनला मारण्याची धमकी दिली.इतरानी मध्यस्ती केली विलसन कश्मिरी गेटच्या जवळ तळ ठोकून बसला. ब्रीटीश सैन्य आता विस्कळीत झाले होते बरेचसे अधिकारी /सैनीक जखमी झाले होते.
इकडे क्रांतीकारी सैन्य सततचे अपयश , उपासमार यामुळे हताश झालेले होते . नाही म्हणायला अफगाणी मुजाहिदीन लहानमोठे हल्ले चढवत होते. पण त्यात सुसूत्रता नव्हती . हळूहळू ब्रीटीश सैन्याने बंडखोर( क्रान्तीकारी) सैन्यावर विजय मिळवायला सुरवात केली. १६ सप्टेंबर ला बंडखोरांकडील दारुखाना त्यानी कब्जात घेतला. १८ सप्टेंबरला जामा मशीद ताब्यात घेतली. लाल किल्ला देखील ताब्यात घेतला .
2
( तोफ गोळ्यानी झालेल्या जखमा अंगावर अजूनही मिरवणारे कश्मिरी गेट)
२० सप्टेंबरला हुमायूनच्या मकबर्‍यात लपून बसलेल्या बहादूरशहा: जफर आणि त्याच्या तीन मुलाना ताब्यात घेतले .
3
( २० सप्टेंबर ला कॅपटन विल्यम हडसन ने बहादूरशहा जफर ला ताब्यात घेतले. फोटो आं.जा. वर उपलब्ध)
दुसर्‍या दिवशी खूनी दरवाजाजवळ बहादूरशहाच्या तीनही मुलाना फाशी दिली गेले . त्या तिन्ही मुलांची डोकी बहादूर शहा जफर ला नजर करण्यात आली.दिल्लीतील बंड मोडून गेले होते.२१ सप्टेंबर ला दिल्ली ( शहाजहानाबाद) पूर्णपणे ताब्यात घेतले. भारतीय स्वातन्त्र्य संग्रामाच्या दृष्टीने हा एक मोठा मानसीक आघात होता.
या घटनेचा परीणाम भारतातील इतर ठीकाणच्या लढायांवर झाला.
अंगावर टाकलेली जबाबदारी पूर्ण झाल्या नंतर दोन दिवसानी २३ सप्टेंबरला जॉन निकोलसनचा मृत्यू झाला.
4
(असे सांगतात की कडव्या शिस्तीचा भोक्ता असलेला निकोल्सन हा विक्षीप्त म्हणून प्रसिद्ध असला तरीही त्या सैनीकांत तो फार आदरणीय होता. त्याच्या कबरीवरची फुले उचलुन बंडखोर शीख / जाट सैनीकानी इंग्रजांविरुद्ध न लढण्याची शपथ घेतली )
( क्रमशः)

१८५७ अ हेरीटेज वॉक (3)


1
( हाच तो बाडा हिंदु राव ( फोटो अंतरजालावरून साभार) सन १८५८ )
2
हा फ्लॅग टॉवर येथे ११ मे रोजी बंडखोर सर्वप्रथम एकत्रीत झाले. ( फोटो आंतरजालावरून) १८५८
मिर्झ मुघल ने दिल्ली ( शहाजहानाबाद ) शहरात शांतता आणण्याचा प्रयत्न केला पण त्याची पोहोच फक्त लाल्ल किल्ल्याच्या भिंतींच्या आतच मर्यादीत होती . शहराच्या बाहेर गुज्जरानी लोकांकडून पैसे वसूल करायला सुरवात केले. दिल्ली शहरातील लोकांची अवस्था मात्र फारच बीकट झाली. लोक चिडून जो जो अभारतीय ( युरोपीय) दिसेल त्याला लुटू लागले.
इकडे ब्रीटीशानी सैन्याची जमवाजमव सुरु केली . ब्रीटीशांचे बरेचसे अधिकारी दिल्लीतेले उन्हाळ्यामुळे कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी सुटीवर गेलेले होते . लोकाना जमा करण्यात टेलीग्राफ मशीनचा या साठी फारच मोठा उपयोग झाला. २७ मे पर्यन्त त्यानी कर्नाल येथे असलेल्या काही सैनीकी तुकड्या दिल्लीत हलवल्या.
८ जून ला बदली की सराय येथे त्यांची बंडखोरांसमवेत पहिल्ली चकमक झाली. त्यात गुरखा पलटणीने बंडखोराना हुसकावून लावले. बंडखोरांचा बराचसा दारुगोळा या छोट्या चकमकीत कामी आला.
कंपनी सरकारच्या सैन्याने जनरल बर्नार्डच्या अधिपत्याखाली आता दिल्ली रीज चा ताबा घेतला होता. रीज हा यमुनेच्या ( काबूल गेट) जवळील साधारण १२०० यार्डाचा खडकाळ पट्टा आहे. दिल्लीचा उन्हाळा आणि रीज मधील वातावरण हे या रोगदायक होते. तरीही जनरल बर्नार्डने लढा चालूच ठेवला.१३ जून ला त्याने आपल्या सैन्याला हल्ला चढवायच आदेश दिला. काही गैर समजामुळे संपूर्ण तुकडी पोहोचु शकली नाही ऐन लढाईत हल्ल्याचा आदेश मागे घेण्यात आला.यातच
इकडे दिल्लीत रोज नवनवे बंडखोर सैनीक येत होते. त्यांच्या संख्येत भर पडत होती नव्या आलेल्यात बरेचसे अफगाणी मुजाहिदीन होते.बंडखोर आता प्रबळ होत होते. त्यानी हिंदुराव च्या वाड्यावर हल्ले चढवायला सुरवात केली.
१९ जून ला आणि २३ जून ला दोन मोठे हल्ले करण्यात आले तीनही बाजूने हल्ले चढवुन इंग्रजी फौजेची कोंडी करण्यात आली. कसेबसे हे हल्ले परतवून लावण्यात आले. रीज्मधील अवस्था फारच बीकट होती. हल्ले आणि आजारपण यामुळे ब्रीटीश सैन्य जेरीस आलेले होते. यातच जनरल बर्नार्ड कॉलरा मुळे मृत्युमुखी पडला.त्याचा कार्यभार घेणारा जनरल रीड हा सुद्धा आजारी होता. त्यामुळे आर्केड विल्सन ला मेजर जनरल च्या हुद्द्यावर बढती देवून नियुक्ती करण्यात आली. तो देखील अशक्त झाला होता. त्याच्या दिमतीला असलेला नेव्हील चेंबरलीन हा तरुण अधिकारी १४ जुलै ला गंभीर जखमी झाला. याच सुमारास पंजाब हून १४ ऑगस्ट ला ब्रीगेडीयर जॉन निकोल्सन ताज्या दमाच्या नव्या ४२०० सैनीकांची कुमक घेवून दिल्लीस आला. घाबरट आणि थकलेल्या आर्केड विल्सन च्या उलट निकोलसन हा फारच धाडसी आणि कणखर होता.
मिर्झा मुघल च्या अपयाशामुळे बहादूरशहा त्याच्यावर नाराज होता त्याने बरेलीहुन मोठी लूट आणलेल्या बख्त खान या कंपनी सरकारच्या गोलंदाजाला सैनापती घोषीत केले. १ जुलै ला दिल्लीत पोहोचलेल्या बख्त खानाने ९ जुलै ला एक मोठा हल्ला चढवला पण तो अपयशी ठरला. त्यानंतर तो छोटे मोठे हल्ले करतच राहीला बंडखोर सैन्याचे मनोधैर्य वारंवार येणार्‍या अपयशांमुळे हेलकावे खात होते त्यातच प्रत्येक हल्ल्या गणीक त्यांचा दारुगोळा कमी कमी होत होता. बख्त खानाने दिल्लीच्या उत्तरेकडे यमुना नदी ओलांडून ब्रीटीश फौजेवर पिछाडीवरून हल्ल चाढवायचा बेत आखला. २४ ऑगस्टला त्याने ८००० सैनीक आनि १३ तोफा घेवून पालम मार्गे नजफगड च्या दिशेने भर पावसात ला कूच केले पण ब्रीटीश सैन्याने पालम येथील यमुनेवरचा पूल अगोदरच उध्वस्त करून ठेवला होता. पावसाने आणि भुकेने सैन्याची अवस्था आणखीनच बीकट करून ठेवली बख्त खानाचीयोजना त्याने १० दिवस अगोदर अमलात आणली असती तर चित्र वेगळे दिसले असते. १४ ऑगस्ट ला आलेल्या जॉन निकोलसनने २४ ओगस्ट ला बख्त खान निघाला आहे हे कळतात २५ ऑगस्टला नजफगड कडे कूच केले.यावेळी चीफ मॅजीस्ट्रेट थिओफेलस मेट्कॅफ ( हाच १० मे च्या हल्ल्यात मरता मरता वाचला होता) निकोलसन ला मार्गदर्शन करत होता.
दुपारी ४ च्या सुमारस मॅटकॅफ ला बंडखोर सैनीकांच्या हालचालींचा स्पष्ट सुगावा लागला ४ तोफा निमच कारावान सराय ( तात्पुरते निवासस्थान) मधे होत्या तर इतर होत्या ९ तोफा पालम आणि सराय च्या दरम्यान होत्या. निकोल्सन ने त्याचे सैन्य दोन भागात विभागले एका तुकडी चे नेतृत्व करीत त्यानी नजफगडवर हल्ला चढवला अवघ्या २० यार्डावरून त्याने भारतीय सैन्यावर तोफांचा भडीमार केला बख्त खानाचे बराच प्रतीकार केला यात ब्रीटीश सैन्याचे कित्येक सैनीक घायाळझाले एकअधिकारी मृयुत्युमुखी पडला. पण बख्त खान निकोलसनची आगेकूच थांबवु शकला नाही. भारतीय सैनीकाना ( बंडखोराना) माघार घ्यावी लागली . बख्त खानाच्या सगळ्या तोफा ब्रीटीशांच्या हातात पडल्या.
उपासमार पाउस आणि सैन्यातील बेदीली ( बख्त खानाला सेनापती मानायला हिंदू सैनीक तयार नव्हते) या मुळे स्वातन्त्र्य लढा देणार्‍या सैन्याला हार पत्करावी लागली होती. त्यांचे मनोधैर्य अधीकच खचले.
१८५७ च्या दिल्लीच्या लढाईत नजफगडची लढाई हा ब्रीटीश सैन्याचा पहीला मोठा विजय होता. या मुळे ब्रीटीशांचे मनोधैर्य उंचावले गेले.
3
( तोफ गोळ्यांच्या मार्‍यामुळे उध्वस्त झालेले काश्मिरी गेट आणि त्याची तटबंदी ( चित्र आं.जा वरून) १८५८
(क्रमशः )

१८५७ अ हेरीटेज वॉक (२)

हा माउन्ट स्टुअर्ट एल्फिन्स्टन वल्लीच होता. तो खरेतर एक स्कॉटीश व्यापारी होता.
इस्ट इंडीया कंपनीशी संबन्ध आल्यानंतर तो मुंबई इलाख्याचा गव्हर्नर बनला.एत्याचा पुतण्या लॉर्ड जॉन एल्फिन्स्टन देखील मुम्बईचा गव्हर्नर झाला.( त्याच्याच नावे मुम्बईतले इल्फिन्स्टन रोड स्टेशन आहे) एल्फिन्स्टन सर्कल ( सध्याचे हर्निमान सर्कल) हे सुद्धा याच्याच नावाचे
भारतातील नेटीवाना शिकवण्यासाठी केलेल्या ब्रीटीश शिक्षण पद्धतीचा जो पाया मानला जातो त्या एल्फिन्स्टन कोड चा जनक हा माउन्टस्टुअर्ट एल्फिन्स्टन. एल्फिन्स्टन कॉलेजला याचेच नाव दिले गेलेले आहे.
मुम्बैच्या मलबार हील वर बांधला गेलेला पहीला बंगला या माउन्टस्टुअर्ट एल्फिन्स्टनचा होता. त्या नंतर तिथे बर्‍याच इंग्रज अधिकार्‍यानी बंगले बांधले.आणि मलबार हील हे एक प्रतिष्ठीत ठिकाण बनले.
सातार्‍याची गादी दत्तक विधानाच्या प्रश्नावरून इस्ट इंडीया कंपनीने खालसा करायचे ठरवले. त्या वेळच्या छत्रपती प्रतापसिंह महाराजाना अजिंक्यातार्‍यावर कैदेत ठेवण्यात आले.
छत्रपतिंची बाजू ब्रिटीश पार्लमेंट मध्ये मांडावी म्हणून रंगो बापुजी गुप्ते इंग्लंडला देखील जावून आले.
पण तेथे त्यांचे काहीच चालले नाही.
१८५७ च्या बंडाची बीजे या घटनेत रुजली गेली. रंगो बापुजी गुप्तेनी दुसर्‍या बाजीराव पेशव्यांचे चिरंजीव नानासाहेब आनि तात्या टोपे यांची गाठ घेवून एक सशस्त्र सेना बांधण्याचा घात घातला. सातारा सांगली बेळगावकोल्हापूर भागातून तरुणांची भरती देखील सुरू केली. पण ब्रीटीशाना तो बेत कळाला . भरती केलेल्या पैकी बरेचसे तरूण ब्रीटीशानी पकडून ठार केले. रंगो बापुजी गुप्ते ठाण्याला जांभळी नाक्यावर
( रंगो बापुजी गुप्ते चौक) एका लग्नाला येणार आहेत हे कंपनी सरकारला कळाले . त्यानी पोलीस पाठवले . रंगो बापुजी तेथून वेशांतर करून पळाले त्या घटने नंतर ते कोणालाच दिसले नाहीत. कंपनी सरकार कडे या घटनेची नोंद आहे Missing July 5, 1857
सती प्रथा बंद करणे संस्थाने खालसा करणे इस्ट इंडीया कंपनी बद्दल भारतीयांच्या मनात आकस होताच.
२९ मार्च १८५७ मीरतला झालेल्या मंगल पांडेने त्याच्या अधिकार्‍यावर हल्ला केला. मंगल पांडेवर खटला दाखल होऊन त्याला फाशीची शिक्षा झाली १८ एप्रील ला ठरवलेली फाशी कंपनी सरकारने १० दिवस अगोदरच अमलात आणली. त्याचा सहकारी जमादार इश्वरी प्रसाद ला २२ एप्रील ला फाशी दिली.
आग्रा अंबाला अलाहाबाद मीरत येथे कंपनी सरकारचे फार मोठे सैनीक तळ होते. २४ एप्रीलला लेफ्टन्ट कर्नल जॉर्ज कार्मिशेल स्मिथ ने त्याला पलटणीला फायर ड्रील ची आज्ञा दिली. सैनीकांच्या मनात काडतुसांत वापरल्या जाणार्‍या चरबीवरून असंतोष खदखदत होता. ९० पैकी ८५ जणानी फायर ड्रील करण्यास नकार दिला.
त्या सर्वांचे कोर्टमार्शल केले गेले त्या सर्वाना १० वर्षाचा कारावास ठोठावला गेला. सैनीक तळावरील सर्वांसमोर त्यांचे गणवेश उतरवले गेले. जेल मध्ये जाताना त्या ८५ सैनीकानी इतर सर्वांच्या बघेपणाबद्दल निषेध केला मीरत शहरात अशांतता पसरली .दुसर्‍या दिवशी गावात काही ठीकाणी जाळपोळ झाली काही सैनीकानी कैदेतील सैनीकाना बळाचा वापर करून सोडवण्याचा कट रचला जातोय अशी माहिती ब्रीटीश अधिकार्‍याना दिली पण त्यानी त्याकडे दुर्लक्ष्य केले. रवीवार असल्याने बरेचसे अधिकारी साप्ताहीक सुट्टीवर होते. संध्याकाळी सैनीक बंड करून उठले. त्याना शांत करण्यासाठी म्हणून केलेल्या गोळीबारात कंपनी सरकारचे स्वतःचेच लोक मारले गेले.
जमावाने संध्याकाळी बाजारात सुट्टीवर असलेल्या काही अधिकार्‍यांवर हल्ला केला. त्यात पन्नास लोक ठार झाले.
मीरत त्यानंतर शांत झालेच नाही. १० मे च्या दिवशी धनसिंग कोतवालाने कैदी सैनीकांना सोडवण्यासाठी जेलचे दरवाजे खुले केले. त्या ८५ सैनीकांसोबतच जवळ जवळ ८०० कैदी पसार झाले.
कंपनी सरकारचा अधिकारी मेजर जनरल हेवीट हा म्हातारा आणिआजारी होता.त्याने स्वतःच्या सैनीकाना काहीच आज्ञा दिल्या नाहीत. सैनीक कसेबसे स्वतःचे रक्षण करू शकले.
दुसर्‍या दिवशी बंडखोर सैनीकांचा बीमोड करायला आलेल्या सैनीकाना आढळले की बंडखोर सैनीकाने दिल्लीच्या दिशेने कुच केले आहे.
११ मे ला बंडखोर सैनीकांची पहिली तुकडी दिल्लीला पोहोचली. त्यानी दिलीच्या किल्ल्यात प्रवेश केला ८२ वर्षाच्या बहादूर शहा जफरला खिडकीतून हाक मारली आणि बंडाचे नेतृत्व करण्याची विनंती केली. बादशहा ने साधे शिपाईगडी म्हणून त्यांना फारसे महत्व दिले नाही.पण राजवाड्यातील काहीनी बंडाला पाठिंबा दिला. दुपारपर्यन्त बंडाची बातमी शाजहानाबाद शहरभर ( शहाजहानाबाद : लाल किल्ला + आसपासचा परीसर) )पसरली.
दुपारी चंदरवाल मधील काही गुज्जरानी कम्पनी सरकरच्या सर न्यायाधीशांच्या घरावर हल्ला चढवला. ब्रीटीश तसेच स्थानीक ख्रिश्चन हे सुद्धा त्यांच्या रोषाचे रोख होते.
खरे तर त्याकाळी दिल्ली हे इस्ट इंडीया कंपनीचे तसे काही फारसे मोठे ठाणे नव्हते.मुघल बादशहा ची जी काही सत्ता उरली होती ती फक्त लाल किल्ला आणि त्या भोवतालच्या भिंतीच्या आत.
kashmiri gate
( लाल किल्ल्याच्या आतील शहरात जाण्यासाठी असलेले हे काश्मिरी गेट. आपण पहातोय ती किल्ल्याच्या आतील बाजू. बंडखोर या बाजूला होते पलीकडील बाजूस कम्पनी सरकारचे सैन्य होते. लढाई जवळजवळ जून १८५७ ते सप्टेंबर १८५७ अशी चार महिने चालली होती)
kashmiri gate2
कंपनी सरकारचा कारभार मुख्यतः कलकत्त्याहून चालायचा. दिल्लीत कंपनी सरकारच्या फक्त ३ पलटणी ( रेजीमेन्ट्स) होत्या. त्या देखील उत्तरेकडच्या कश्मिरी गेट जवळ. कंपनी सरकारच्या गार्ड्स नी हे गेट बंद करण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यन्त उशीर झाल होता.
दुपारी शहरात एक मोठा स्फोट होऊन आगडोम्ब उसळला. कंपनी सरकारचा मॅगझीन डेपो ( बारूद खाना) जेथे होता तेथील अधिकार्‍यानी आपला प्रतीकार अपूरा पडतो आहे हे जाणवल्यानंतर दारुगोळा बंडखोर सैनीकांच्या हाती पडू नये म्हणून जिवाची जोखीम असतानाही दारूखान्याला आग लावून दिली होती.
barud khana
( हाच तो दारुखाना . कंपनी सरकारने त्या वेळेस असणार्‍या अधिकार्‍यांच्या स्मरणार्थ हे स्मारक बांधले आहे. वर दिसणार्‍या मोठ्या पाटीवर अ८५७ सालच्या घटनेचा उल्लेख "बंड" असा आहे.भारत सरकारने त्याखाली एक छोटी करेक्षन नोट लावून त्यात भारत आणि पाकिस्तान सरकारानी या बंडाला स्वातन्त्र लढा म्हंटल्याचे त्यात नमूद केलेले आहे. पण मूळ लेख असलेली पाटी तशीच ठेवली आहे हे विशेष)
नंतर जवळजवळ ३००० बॅरल गनपावडर चा साठा असलेले एक मॅगझीन सैनीकांच्या हाती लागले. तेसुद्धा फारसा प्रतीकार न होताच. आता पर्यन्त विना नेतृत्व उठाव करणार्‍या बंडखोर सैनीकांची ही मोठी सरशी होती.
१२ मे ला बहादूरशहा लाल किल्ल्यात बर्‍याच वर्षानी दरबार भरवला . इतिहासकार विल्यम दालरिंपल लिहीतो की त्या वेळेस बहुतांशी इस्ट इंडीया कंपनीच्या सेनेतून पळून गेलेले बरेचसे सैनीकच त्या दरबारात हजर होते. त्यानी बहादुरशहा जफरला अगदीच घरगुती वागणूक दिली. काहिनी तर त्याला फारसा मानही दिला नाही. ( विल्यम डालरिंपल लिहितो की त्यावेळेस बहादुरशहा जफरचे वय ८१ वर्ष होते) बहादूरशहा दिल्लीत चाललेली लुटालूट फारशी पसंत नव्हती .त्याने या दरबारात बंडाला जाहीर पाठिंबा असल्याची घोषणा केली. १६ मे रोजी बंडखोर सैनीक आणि लालकिल्ल्यातील नोकरानी ५२ युरोपीय लोकांना पकडून आणले .बहादूरशहाचा विरोध असतानाही त्या सर्वाना लालकिल्ल्यातील एका पिंपळाच्या झाडाला लटकावून फासावर चढवण्यात आले.
दिल्ली आणि शहराची परिस्थिती फारच बिघडली होती.बहादूरशहा जफर ने बंडखोर सैन्याच्या सेनापतीपदी त्याचा मुलगा मिर्झा मुघल याची नेमणूक केली. मिर्झा मुघल ला लढाईचा काहीच अनुभव नव्हता. बंडखोर सैनीक त्याला मान देत नव्हते त्याचे हुकूम मानत नव्हते. सैनीक आपल्या रेजीमेन्टच्या अधिकार्‍या शिवाय इतर कोणाचेही हुकूम मानायला तयार नव्हते.या सगळ्या गोंधळात देखील मिर्झा मुघलने शहरात ( शहाजहानाबाद) परिस्थिती नियंत्रणाखाली आणायचा प्रयत्न केला. शराबाहेर गुज्जर लुटालुट करतच होते.एकूणच अनागोंदी कळसाला पोहोचली होती. दिल्ली काबीज झाली अशी बातमी सर्वत्र पसरली. बंडखोर चहुबाजूनी दिल्लीत येवू लागले.
ग्वाल्हेरच्या राजांचे बंधु हिंदुराव शिंद्यांचे दिल्लीत ब्रीटीश रेसीडेन्ट शी फारच मित्रत्वाचे संबन्ध होते. ब्रीटीशानी हिंदुरावांच्या वाड्याचा आश्रय घेवून तेथून लढा चालू ठेवला. त्यांचा वाडा म्हणजे किल्लाच बनला होता.
ब्रीटीशानी सैन्याची जमवाजमव सुरु केली. टेलीग्राफ मशीनचा या काळात फारच उपयोग झाला.
त्याचे स्मारक म्हणून कंपनी सरकारने जेथे टेलीग्राफचे ओफिस होते तेथे एक टेलीग्राफ मेमोरीयल बांधले आहे. त्यावरील शिलालेखात एक नोंद आहे The electric Telegraph that saved India
Telegraph Memorial (क्रमशः )

१८५७ अ हेरीटेज वॉक (1)

भारताच्या नव्या जन्माची ही कथा. खरेतर या कथेला सुरुवात होते ११ मार्च १६८९ पासून
मराठी साम्राज्याचा समूळ नायनाट करायचा निर्धार करून औरंगझेब महाराष्ट्रात उतरला खरा.पण त्याला ते तितकेसे जमले नाही ते त्याच्या अंगलटच आले. ११ मार्च ल औरंगझेबाने छ. संभाजी महराजाना हालहाल करून ठार मारले. छ. संभाजी महाराजांच्या मुलाला शाहू महाराजाना कैदेत ठेवले. चिडलेल्या मराठ्यांनी मग औरंगझेबाला स्थिर बसूच दिले नाही त्याला हर प्रकारे त्रास देणे सुरू केले. सन १६९७ सालात छ. राजाराम महाराजानी तह करण्याचा प्रयत्न केला पण तो औरंगझेबाने धुडकावून लावला.
इस १७०७ मध्ये औरंगझेब मरण पावला त्या नंतर त्याच्या वंशजांच्यात मुघल राजवटीच्या वारसांमध्ये राजा होण्याची चुरस सुरु झाली.
औरंगझेबाने भारताचा बराचसा मोठा भूभाग एकछत्री करभाराखाली आणला होता.
आज ज्याला आपण अफगाणीस्तान , पाकिस्तान , बंगलादेश आणि भारत म्हणून ओळखतो या सर्व भूभागावर औरंगझेबाचे साम्राज्य पसरले होते. औरंगझेबाने पसरवलेले हे एवढे मोठे साम्राज्य कोण पेलणार हा एक प्रश्नच होता.त्याच्या मुलांच्यात ना त्याच्या एवढी बुद्धीमत्ता होती ना कुवत.
साम्राज्य स्वतःच्याच ओझ्याखाली चिरडून जाऊ लागले.
मराठ्यानी छ. शाहु महाराजाना स्वतन्त्र केले आणि मराठे आणी दिल्लीच्या गादीची मराठा सत्तेची थेट वैर यात्रा अल्पकाळ तरी थांबली.
वयाच्या८९ व्या वर्षी सतत ४८ वर्षे एकछत्री सत्ता उपभोगून औरंगझेब गेल्यानन्तर मुघलसाम्राज्याचा मात्र झपाट्याने अस्त होऊ लागला. दिल्लीच्या सिंहासनावर बादशहा अक्षरशः ये जा करू लागले. कोणीतरी यावे गादीवर बसावे आणि कपटाने दुसर्‍याने त्याचा काटा काढत स्वतःला राजा म्हणून घोषीत करावे हा नित्य परीपाठ झाला. मुहम्मद रंगीला असा ज्याचा उल्लेख होतो तो मुहम्मद शाह सतत कोणा ना कोणा कडुन हरतच होता . १७३९ मधे नादीर शहा दुर्राणी ने तर कळसच गाठला . मुहम्मद रंगील्याने दिल्ली दरावाज्याच्या किल्ल्या स्वतः होऊन नादीरशहा च्या ताब्यात दिल्या नादीरशा दिल्लीत घुसला त्याने दिल्ली अक्षरशः कफल्लक केली . पाहुणा म्हणून राहिला आणि जाताना दिल्लीतील ३३ हजार लोकांचे शिरकाण करत मयूर सिंहासन ,कोहीनुर हीरा ,दर्या ई नूर हीरा अशी बरीच मोठी लुट घेवुन गेला . मुहम्मद रंगील्या बद्दल लोकांच्या मनात इतका तिरस्कार होता की त्याच्या नर्तकी असलेल्या बायकोने बांधलेल्या मशीदीला लोक "रंडी की मस्जीद" म्हणून सम्बोधत.
मुघलांचे अफगाणीस्थान पासून बंगाल पर्यन्त पसरलेले राज्य आकसत जाऊन अवघ्या लाल किल्ल्याच्या भिंतीत सिमीत झाले. १६९७ साली काबूल पासून कलकत्त्या पर्यन्तच्या २४ मुलुखातून एकुण ३८,६२४,६८० इतक्या पौंडाचा महसूल गोळा करणारे साम्राज्य अक्षरशः भिकेला लागले.
१७६५ सालच्या बक्सरच्या लढाईनंतर तर तात्कालीन बादशहा शाह आलम ने इस्ट इंडीया कंपनी बंगाल बिहार आणि ओरीसा बरेच काही गमावले. लॉर्ड क्लाईव्हने मुघल साम्राज्याची नाणी देखील इस्ट इंडीया कंपनी ठरवू लागली. हिंदुस्थानात कंपनी सरकारचे बस्तान व्यवास्थीत बसवले.
छ शाहु महाराजानी पेशव्याना पंतप्रधान केले त्यांच्या निधना नंतर छ रामराजानी नाममात्र राजा रहाणे पसंत केले आणि राज्यकारभार पुर्णपणे पेशव्यांच्या स्वाधीन केला.
१७६१ च्या पानिपतच्या युद्धा नंतर मराठेशाही काही काळ दुर्बळ झाली मात्र माधवराव पेशव्यानी मराठा साम्राज्याला पुन्हा वैभवाचे दिवस दाखवले.
पण त्यंच्या निधना नंतर मराठा साम्राज्याने एक द्रष्टा गमावला.
पेशवे शूर होते पण अंतर्गत कलहांमुळे पेशवाई देखील दुबळी होत गेली. सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात तर राज्य कारभार इतरांच्या हाती गेला.
त्या नंतर गादीवर आलेला पेशवा दुसरा बाजीराव हा तर पळपुटा बाजीराव म्हणूनच इतिहासात ओळखला जातो. अटकेपर्यन्त झेंडे फडकवणार्‍या पेशव्याना पुण्याहून पळून जायची वेळ आली.
अहमदनगरच्या तहानंतर तर पेशव्यांचे सत्ता जवळजवळ संपुष्टात आली.
१८१८ साली खडकी आणिकोरेगावच्या लढाईनंतर तर पेशव्यांची सत्ता संपुष्टात आली.
इस्ट इंडीया कंपनीने पेशव्यांची रवानगी कानपूरजवळील बिठूर नावाच्या एका खेड्यात केली.
 माउन्ट स्टुअर्ट एल्स्फिन्टनने सातार्‍याच्या गादीवर छ.प्रतापसिंहांना बसवले. दत्तक वारसाच्या प्रश्नावरून १८४९ सातार्‍याची गादी खालसा देखील केली.
एका व्यापारी कंपनीची ,इस्ट इंडीया कंपनीची भारताच्या विशाल भूभागावर सत्ता प्रस्थापित झाली

Monday 13 June 2011

माझा झंपक पणा

त्या दिवशी सेशन जरासे लांबलेच. लोकांचे प्रश्न जसे संपतच नव्हते.
सगळे आटोपुन पुण्यातून निघायला रात्रीचे साडेनऊ वाजले.
स्वारगेटवर येऊन बस पकडली.
बसने कात्रज पार केले कंडक्टरने तिकिटे सर्वाना दिली गेल्याची खात्री केली आणि स्वतःचे हिषोब संपवुन गाडीतले दिवे बंद केले.
सेशन जोरदार झाला होता थोडे थकल्यासारखे झाले होते पण एखादे सेशन मनासारखे झाल्यानन्तर जो उत्साह असतो तसाच उत्साह वाटत होता.त्यामुळे झोप लागायचा प्रश्नच नव्हता.
काही वाचायचे तर अंधारात वाचायचे कसे. मी सेशनची उजळणी करत बसलो. एका श्रोत्याने एक मस्त प्रश्न विचारला होता. मी थोडासा अडखळलोच होतो त्यावर .
बोलताना मी म्हणालो होतो की आपली प्रत्येक गोष्ट ही रूटीन बनलेली असते. जेवण , कपडे , मित्र , पुस्तके या सर्वांचा एक पॅटर्न ठरुन जातो आणि सगळ्या गोष्टी साचेबंद होतात. आपल्या जगण्यात थोडे वेगळेपण असले तर जीवनाचा आनन्द घेता येतो.
त्या श्रोत्याने विचारले साचेबंदपणा कसा काय म्हणता? मग रोज जेवण घ्यायचे नाही काय. रोजच्या जेवणात आपण कुठे तेचतेच खातो. ते वेगळेवेगळे असतेच की.
आपण टीव्ही बघतो. तो वेगळेपणाच असतो.
तो म्हणत होता त्यात तथ्य होते.
तुमचे बरोबर आहे पण आपण जो विचार करतो त्याच्यात ही साचेबंदपणा आलेला असतो. उदा मनोरंजन सुद्धा आपण एका ठरावीक प्रकारचेच अपेक्षीत ठेवतो .
जेवताना आपल्याला जे पदार्थ नक्की माहित असतात तेच चाखतो. आवडते आणि नावडते देखील. रोज एका ठरावीक वेळेसच जेवतो. बरीच कुटुंबे शनिवारी संध्याकाळी हॉटेलात जातात. फ्रीक्वेन्सी थोडी कमी पण तरीही फ्रीक्वेन्सी ना.
बोलण्याच्या नादात मीथोडा पुढे गेलो आणि म्हणालो सेक्स/ कामजीवन हे सुद्धा आपल्यासाठी एक रूटीन बनलेले असते. मी कित्येक जोडपी अशी पाहिली आहेत की जी ठरावीक फ्रीक्वेन्सीने कामजीवन उपभोगतात. त्याचा ही मग कंटाळा येतो. खरे तर त्या रुटीनचा ठरावीक चाकोरीचा कंटाळा आलेला असतो. त्यामुळे आयुष्य नीरस वाटू लागते.
माणूस हे यंत्र नव्हे. पण आपण कामजीवन यंत्रवत जगतो.
त्या श्रोत्याने एकदम विचारले....त्यात बदल कसा आणणार? आणि सगळे हसले.
मी म्हणालो की आपण जे जगतो त्यातला साचेबंदपणा सोडण्यासाठी जे करतो त्यात बदल हवा
म्हणजे.....?
म्हणजे की आपण आनन्द ज्या पद्धतीने उपभोगतो त्यात थोडा बदल हवा. बाह्य साधने बदलण्यापेक्षा आपण आपल्या वृत्तीत बदल करायला हवा.
उदा: आपण विनोदसुद्धा एका ठरावीक पद्धतीचेच ऐकतो त्याचा पॅटर्न ठरलेला असतो. गम्मत करतो त्याचाही पॅटर्न ठरलेला असतो. कधितरी आपण आपल्या वयाला शोभेल असे न वागता लहान मुलांसारखे वागून पाहूयात त्यांच्या सारखी गम्मत करुयात. आपले जगण्यातले रूटीन मोडले की जगणे आनन्ददायी ठरते.
त्यानन्तर थोड्याशा इतर मुद्द्यांवर चर्चा झाली. कार्यक्रम आटोपल्यानन्तरही लोकांचे नेहमीप्रमाणे स्वतःच्या समस्यांशी निगडीत खाजगी प्रश्न झाले.
आणि मी निघालो.
विचारल्या गेलेल्या प्रश्नांमधला माझ्या उत्तरांमधला आता साचेबंदपणा येत चालला होता.
काहीतरी वेगळे करुन बघायचे म्हणजे तरी काय?
मी माझ्याच विचारांत होतो. त्या अंधारात अचानक मला माझ्याकडे कोणीतरी रोखून टक लावून बघतय अशी जाणी झाली. मी इकडे तिकडे पाहिले.
बहुतेकजण एस्टीच्या तालावर मानाहलवत गाढ झोपले होते.
लोकाना बघता बघता माझे लक्ष्य समोरच्या सीटवरच्या दोन बायकांकडे गेले. ड्राव्हरच्या मागच्या उलट्या सीटवर बसलेल्या असल्या त्या दोघीना बसमधले सर्व चेहेरे दिसत असावेत. त्यांचे डोळे विलक्षण तेजाने चमकत होते. कुत्र्या मांजरांचे डोळे चमकतातना तसे काहिसे.
मला बहुते भास झाला असावा. मी पुन्हा त्यांच्या कडे पाहिले.त्या दोघींच्या माना हलत होत्या पण डोळे मात्र चमकत होते.
या बाया डोळे सताड उघदे टाकून झोपल्यात की काय मी मनात म्हणालो.
मनातले कुतुहल स्वस्थ बसु देईना. मी नीट निरखून पाहिले.
त्या दोघी झोपलेल्याच होत्या. त्यांच्या मिटलेल्या पापण्यांवर बसमधल्या निळ्या लाईटचा उजेड पडून त्या चकाकत होत्या.
मला मी घेतलेल्या कुशंकांचे हसू आले ....
घरी पोचलो. आणि त्या चमकत्या पापण्यां आठवतच हसत झोपलो.
सकाळी भल्या पहाटेच जाग आली. बहुधा पाच वाजले असावेत. अचानक एक भन्नाट आयडीय सुचली.
गम्मतीत थोडे नाविन्य आणले तर?
मी माझ्या मुलीची गम्मत करायची ठरवली.
तिच्या वॉटरकलरच्या बॉक्समधून पांढरा रंग ब्रशने माझ्या पापण्याना लावला. त्यावर दोन्ही पापण्यांवर काळी भरीव वर्तुळे काढली.
आता पापण्या मिटल्यावर त्यावर रंगवलेले वटारलेले डोळे दिसत होते. आरशात एकेक डोळा बंद करून खात्री करून घेतली.
हॉल मध्ये जाऊन झोपलो. थोड्या वेळाने माझी मुलगी येईल आणि ती मला उठवयाला येळ त्यावेळी धमाल गम्मत येईल अशा विचारत मी डोळे मिटले.
थोड्या वेळाने माझ्या वडीलांचा मोठ्याने ओरडल्याचा आवाज आला. मी जागा झालो वडील ते उभे होते त्या जागीच मोठ्याने ओरडत होते . ते खूप घाबरले होते. त्याना दरदरून घाम फुटला होता. मी त्यांच्या जवळ जायला लागलो तसे ते भूत पाहिल्यासारखे अजूनच जोरजोराने ओरडू लागले.
माझ्या रंगवलेल्या वटारल्या डोळ्यांचा तो परीणाम होता.
मी लहान असतो तर नक्की धपाटे खाल्ले असते या असल्या मस्करी साठी.
घरातले सगळे गोळा झाले ते आमच्या दोघांचे अवतार बघून खोखो हसू लागले.
आई ने डोक्याला हात लावला म्हणाली. झंपकच आहेस तू. इवढा मोठा झालास तरी अजून लहान मुलांसारखा राहिलास.
तो झंपकपणा आज आठवला तरी सगळेच जण कितीही मरगळलेलो असलो तरी एकदम रीफ्रेश होतो.

Sunday 5 June 2011

पायर्‍यांची विहीर

विहीरीला पायर्‍या असतात.
मी लहानपणी पाहिलेली विहीर म्हणजे काळ्यारामाच्या देवळातली.
तीला पायर्‍या होत्या .त्याना पायर्‍या का म्हनायचे हा प्रश्नच होता. भिन्तीतून पुढे आलेल्या दगडाच्या टोकाला पायरी म्हणायचे. त्यातून तोल साम्भाळत आम्ही विहीरीत पडलेला चेंडु घ्यायला जायचो. आणि बहुतेक वेळेस ट्रस्टीकाकांच्या शिव्या खायचो.
काल इथे अहमदाबादपासून पासून १८ किमी वर असलेल्या अडालज गावात असलेली हीपायर्‍यांची विहीर बघायला गेलो. आणि एक भूलोकीचा चमत्कार पहातोय असेच वाटले.
इस १४९९ मध्ये कोण्या रुडाबाईने दुश्काळी काम म्हणून बाम्धून घेतलेल्या या विहीरी चे बांधकाम एक चमत्कारच आहे.
गेली पाचशे वर्षे हा चमत्कार इथल्या लोकानी साम्भाळून ठेवलेला आहे.
गुजरातमध्ये दुश्काळ पडलेला होता. जनतेला रोजगार मिळावा म्हणून वीरसिंह वाघेला राजाच्या राणीने ही विहीर बांधवून घेतली. थोडिशी जैन शैलीची थोडीशी हडप्पन शैलीची ही विहीर.
पाच मजले असलेली विहीर असे म्हम्तले तर आपल्या डोळ्यासमोर काहीच उभे रहात नाही.
त्या जागेवर जाईपर्यन्त काहीच कळत नाही. बाहेर लावलेला बोर्ड पाहूनही काही खुलासा होत नाही.
adalaj waw 1
आपण एका देखण्या प्रवेशद्वारातून पायर्‍या उतरायला लागतो
2
पुढे येणारे दृष्य काय असेल याची अजूनही कल्पना येत नाही
3
आणि शब्द सापडणार नाहीत असे एक भव्य शिल्प दिसायला लागते
4
पाच मजले जमिनीखाली असलेले हे बाम्धकाम म्हणजे कल्पनेचा एक सुंदर खेळ आहे.
भर उन्हातून जाणार्‍या वाटसरुना साधू सन्यासाना घटकाभर विसावा घेता येईल ताजे तवाने होता येईल या उद्देशाने रुडाबाईने ही विहीर बांधली
इथे बाम्धकामुळे उन सावलीचा एक मजेशीर खेळ सुरू होतो.
आणि त्यामुळे जमिनीखाली पाच मजले असूनही हवा आणि उजेड खेळते रहातात
5
स्ट्रक्चरल सौंदर्य म्हनजे काय याची अनुभूती घेत आपण खाली उतरत रहातो
6
भिंतीवरील नक्षी ,आणि भुमिती ची मजा एकाच वेळेस घेता येते
7
आणि मग बांधकामा मधले एक एक चमत्कार बघायला मिळतात.
8
त्याकाळच्या इंजिनीयरिम्गची कमाल. स्प्रिंगप्रमाणे गोलाकार स्पायरल वळणे घेत खाली उतरणारा हा दगडी जिना. एकावर एक रचलेल्या दगडांची टोके एकमेकात फसवून चुना न वापरता केलेले हे बांधकाम अती अद्भुत आहे.
9
वावाटसरूला स्वच्छा पाणी मिळावे म्हणून रचलेली ही विहीर
10
इथून लवकर पाय निघत नाही.
11
या विहीरीत हजारभ सैन्य सहज सामावू शकायचे.
या वविहीरीचे बांधकाम वीस वर्षे चालले होते. कडक उन्हाळ्यातही विहीर आटत नाही.
एका दंतकथे नुसार सुलतान बाघेराने राजा वीरसिंह वाघेलाचापराभव केला आणि रुडाबाईसमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला
रुडाबाईने विहीरीचे बांधकाम पूर्ण करू दे . ते झाल्यावर लग्न करेन असे वचन दिले.
सुलताना ने जेंव्हा जबरदस्ती करायचा प्रयत्न केला तेंव्हा रुडाबाईने ( रुडा या जुन्या गुजराथी शब्दाचा अर्थ " चांगली") त्या विहीरीत जीव देऊन आपली आयूष्ययात्रा संपवली.
सुलतानाने चिडून विहीर बांधणार्‍या कारागीरांचा वध केला.

Wednesday 1 June 2011

वर्तमान

काल मी तेथे फुलांच्या देशात होतो
फुलपाखरांना पहाताना तुला शोधीत होतो
गवसले तेथे एक गुढ काय मला
ते पाहून पुन्हा पुन्हा बेभान होत होतो.
सांगता न येते ते मला काय होते
रंध्रातुनी माझ्या आनंदे वहात होते.
प्रत्येक फुलात तूच तूच होतीस
ऐसा गोड आभास अनुभवत होतो
मी गात गाणे देवाला आळवीत होतो
र्‍हदयातील भावना तुला कळवीत होतो
सखये रोज तुला मी तेथे ऐसाच भेटत असतो
आठवणींच्या पुस्तकातले वर्तमान जगत असतो

Tuesday 24 May 2011

स्वर्गाची सहल

या दिवाळीत सहलीसाठी चक्क स्वर्गात जायचे असे ठरवले. त्या प्रमाणे एका दिवशी भल्या सकाळी निघालो. सातार्‍याच्या खिंडीतल्या गणपतीबाप्पा ला जाताजाता डावीकडे न वळता उजवीकडे सज्जन गडाकडे वळालो. सज्जन गड मागे टाकून चाळकेवाडी ला आलो.
येथे पवनचक्क्यांचे जंगल आहे. उसाच्या शेतात उभे रहावे तसे आम्ही पवनचक्क्यांच्या शेतात उभे होतो
pavanchakki
हे महाराष्ट्रातील सर्वात उंच पठार. महाबळेश्वरच्या उंचीइतकेच.
इथला भन्नाट वारा आणि रानफुले. कास पठारासारखेच हे सुद्धा वॅली ऑफ फ्लॉवर्स आहे.
fule
इथे काही वनस्पती चक्क मांसाहारी आहेत. त्या किडे खातात. किडे फुलाना चिकटतात आणि तेथेच विरघळतात.
मी गेलो तेंव्हा फुलांचा बहर ओसरला होता.
पण काही म्हणा या सानुल्या गवतफुलांची ऐट काही औरच
fule2
येथून पुढे पठारावरून रस्ता नसलेल्या भागातून विचारत विचारत येड्यासारखे गाडी रेटत पुढे गेलो. हा रस्ता पुढे पाटणला उतरतो
पाटणहून पुढे चिपलूण रस्त्याला लागल्यावर पुढे कोयनानगर लागते. नेहरू गार्डनला उजव्या बाजूला ठेवत थोडे पुढे गेलो की मग विशाल शिवसागर सुरु होतो. तुमचे डोळे पोहोचतील तिकडे हिरव्या रंगाच्या लक्षावधी छटा दिसू लागतात.
green1
त्या सागरनिळ्या हिरव्या रंगाचे वर्णन शब्दात करणे अशक्य आहे
green2
कोयनानगरचा निसर्ग काहीही हातचे राखून ठेवत नाही. तो मुक्त हाताने उधळण करत असतो. आपल्या पिशवीतलीएकेक रत्ने उलगडून दाखवत असतो
green3
कुबेराने खजीना उघडावा त्यातला पाचूचा कप्पा आपल्याला देऊन टाकावा आणि चल घे ऐश कर म्हणावे तशा थाटात हा खजिना आपल्या पुढ्यात येत असतो.
kuber
कधी अवखळ बनून मस्ती करत तर कधी एकदम घनगंभीर होत ;
निसर्ग आपल्या समोर वेगवेगळ्या रुपात येतच रहातो.
green4
यातले कोणते रूप डोळ्यात साठवु आणि कोणते राखीव ठेवु हे ठरवताच येत नाही
खरच निसर्ग जे लिहितो ते गद्य पद्य अशा शब्दात मांडताच येत नाही . जे असते ते सर्व हृद्यच असते.
GADYA PADYA
आकाशाचा निळा गवताचा पिवळसर हिरवा. पालवीला आलेल्या फांदीचा तांबूस हिरवा. जुन्या पानाचा कच्च हिरवा. मधूनच पोपटी झाक मिरवणारी नवी पाने. अशी काही सरमिसळ होते की सांगता येत नाही
RANG
शिवसागराच्या आरस्पानी पाण्याच्या परिणामामुळे काही वेगळीच जादू होत असते
pani
हवेत इतका उत्साह असतो की त्यापुढे मध्यानीचा सूर्य सुद्धा शीतळ भासू लागतो
surya
बोट हळुहळु आपल्या कोयनेच्या जंगलाकडे नेत असते.
boat boat2
इथले काही जंगल हे मुद्दाम लावलेले आहे.
JANGLE4
उघड्याबोडक्या डोंगराना पहायची सवय असलेले डोळे .
त्याना ही मेजवानी च होती JANGLE2
ते जरा कमी घनदाट आहे. पण घनदाट म्हणजे नक्की काय हे इथे येऊनच पहावे
JANGLE JANGLE5
त्याहून पुढे वासोटा बाजूला गेले की नैसर्गीक जंगल पहायला मिळते. त्यासाठी बोटीने दोन तास प्रवास करावा लागतो.
या जंगलात बिबटे ,अस्वले, ससे, खारी ,कुत्री, तरस असे अनेक प्राणी आहेत. पण ते बहुतेकदा उन्हाळ्यात तलावाच्या काठाशी पाणी प्यायला आल्यावर पहायला मिळतात. जंगलात पाणी असताना प्राणी बाहेर फारसे पडतच नाहीत.
दूरचे हिरवे डोंगर, हिरवे लुसलुशीत गवत नितळ पाणी स्चच्छ आकाश प्रदुषण मुक्त हवा..परत जायला येथून पाय निघत नाही
आपण या चित्रमय निसर्गातलेच एक होऊन जातो.
DONGAR
पण नाईलाज असतो. अजून बरेच काही पहायचे बाकी असते.
kade
निसरडे कडे. अक्षरशः उभ्या चढणीचे डोंगर त्यातून अव्याहत कोसळणारे गडगडाटी धबधबे हे निसर्गाचे रौद्र रूप पाहून घाबरायला होते.
dhabadhaba
पण ते काहीसे आपल्या आजोबांसारखे ....... नातवाला अंगाखांद्यावर खेळवताना उग्र मिशाळ चेहेर्‍याच्या मागे कौतूक भरलेले असते.
dhabadhaba
परतीचे वेध लागलेले असतात. उन्हे उतरु लागलेली असतात. पण पाऊल निघत नाही. निसर्गावर दुपारच्या उन्हाने काही वेगळेच रंग चढवलेले असतातdupar
खरे तर इथून शहरात परत जायला आम्ही सर्वच नाखूष होतो. निसर्गसुद्धा या रे बसा रे जाल रे आत्ता आलात आन आत्ता लगेच कुठे निघालात असेच म्हणत असतो. तो आग्रह मोडवत नाही. पाऊल धबधब्यात थोडेसे विसावते.
dhabadhaba2

एक धागा सूखाचा

प्रेमचंदांची  एक कथा आहे. कधी काळ ऐकलेली...
दोन मित्र होते. दोघे ही अगदी गरीब . नोकरी नाही हाती पैसे नाहीत. काही काम मिळते का ते शोधत गावभर फिरायचे आणि रात्री जेवायला मिळाले तर जेवायचे अथवा पाणी पिऊन झोपायचे हा त्यांचा दिन क्रम
हिवाळ्या चे दिवस होते बरीच थंडी होती. दिवस भर वणवण फिरून काहीच काम मिळाले नव्हते नुसतीच पायपीट.
शिणलेल्या देहाला विश्रांती साठी झोपडीत आश्रय....
अशा स्तिथीत झोपडीच्या दाराला अडसर म्हणून लावलेली वीट वार्‍याने निघाली. दार थडाथडा आउअटू लागले.
बोचरी थंडी आणि वारा आत येऊ लागला...
पहिल्या मित्राने दुसर्‍याला सांगितले....
जरा दार बंद करतोस का.
दुसरा म्हणाला ...मी दमलोय वणवण भटकून. शिवाय सकाळपासून अन्नाचा कण नाही गेला पोटात.
"माझी काय वेगळी परिस्थिती आहे " पहिला म्हणाला " आपण दोघे ही बरोबर होतो की"
"पण मी आजारी आहे तू उठून दार लाव की"
"माझी पाठ गेलीय कामातून"
"माझ्या पायात गोळे आले आहेत"
दोघेही स्वतः किती शिणलोय हे सांगत होते. कोणाचेच पारडे खाली जात नव्हते.
" मी लहान पणी किती खस्ता खाल्या...... धाकट्या भावंडांचे सर्व मलाच करावे लागायचे. आईचे प्रेम कधी मिळालेच नाही"
"मी सुद्धा ते केलय सावत्र आईचा छळ सोसलाय"
दोघांच्या व्यथा सारख्याच होत्या.
शेवटी दोघानी ठरवले की ज्याने जास्त दु:खे भोगली असतील तो झोपेल आणि दुसरा उठून दार लावेल
" मी लहान पणी फार दु:ख भोगले आहे दारुड्या बापाचा पाठ मोडेस्तोवर मार खाल्लाय" पहिला म्हणाला.
"आणि मी सावत्र आईचा" दुसरा म्हणाला.
" मी जेवत असताना समोरचे ताट भिरकावून दिले होते बापाने. मारहाणीत त्याने माझा हात मोडला"
" सावत्र आईने मला तापल्या तव्याचे चटके दिले होते"
".....@#......."
"!!!......----"
दोघे ही मित्र आपापली दु:खे सांगत होते.
दोघांचीही दु:ख्खे तुल्यबळ होती. कोणीच हार जायला तयार नव्हते.
दोघानीही अगदी आठवत होते त्या वयापासून आठवत होती ती सगळी दु:खे उगाळून झाली.
पहिल्या मित्राला हळूहळु राग येऊ लागला.
बाकी काही नाही निदान इतरांपेक्षा आपल्या कडे अभिमान बाळगावा असे काहितरी होते तेच कोणीतरी हिरावून नेत आहे असे त्याला वाटू लागले.
रागाच्या तिरीमीरीत तो ऊठला त्याने दुसर्‍याला लाथाबुक्क्यानी बदडून काढले.
मित्राला मारताना संतापाने तो रडत होता. मारून मारून पहिला मित्र दमला. दुसरा अर्ध्या बेशुद्ध अवस्थेत होता. त्याला आता माराच्या वेदनाच जाणवत नव्हत्या.
भान आल्यावर पहिल्या मित्राला दुसर्‍याची अवस्था जाणवली. तो खजील झाला. त्याने दुसर्‍याची माफी मागितली. त्याला कुठे लागलेखुपले आएह का ते पाहिले. त्याची पाठ चेपू लागला. दुसरा मित्र ग्लानीत क्षीण हसला.
पहिल्या मित्राला त्या अवस्थेत मित्राचे हसणे पाहून नवल वाटले.
"फार मारले नी मी तुला" पहिला खजील होत म्हणाला
" हरकत नाही ...तू संतापाने मारलेस्.........जाऊदेत. सूखे नव्हतीच कधी आयूष्यात. दु:खेच होती. तु प्रत्येक दु:खाच्या बाबतीत आप्ण समसमान होतो. पणआज मी त्या बाबतीत तुझ्यापेक्षा वरचढ ठरलोय. आपला काहीच दोष नसताना मित्राने; लाथाबुक्यानी मारल्याचे दु:ख मी तुला मिळू देणार नाही"

Saturday 21 May 2011

रूपक 1

एक जंगलात एक माकड रहात होते.माकडाला एकदा वाटले की यदाकदाचित कधी जंगलाचा इतिहास लिहीला गेला तर आपले नाव सुवर्णाक्षरात लिहीले जावे. आपल्या नातू पणतू खापरपणतू यानी आपली नाव अभिमानाने घ्यावे. आपल्या नावाने खानादानाला ओळखले जावे. त्या लोकानी मिशांवर ताव देत म्हणायला हवे की आमचे आजोबा पणजोबा खापरपणजोब इतके शूर होते इतके पराक्रमी होते.त्यानी भिंतीवर फ़ोटो मिरवायला हवे. पुतळे रोज हारानी मढवले जायला हवेत
झाले; माकडाने ते मनावरच घेतले.एखादी संधी मिळाली की झाले. शौर्य दाखवायला मिळायला हवे. मग बघतोच . माकड अशी एखादी संधी मिळते का पहायला एका उंच झाडावर जाऊन बसले.जंगलाचा सगळा परीसर त्या झाडावरुन दिसत होता.
एक संधी आणि आपले नाव सुवर्णाक्षरात......
माकड इकडे तिकडे पहात होते. तेवढ्यात त्याला एक सिंह; शिकार करून सावज खाऊन विश्रान्ती घेत झोपलेला दिसला. माकडाला आयती संधी मिळाली
झाडावरुन उतरुन ते तडक त्या झोपलेल्या सिंहाजवळ गेले. आणि माकडाने त्या झोपलेल्या सिंहाच्या कानाखाली एक जोरात वाजवली.
काहितरी करण्याच्या जोषात माकडाने सिंहाच्या कानाखाली वाजवली खरी पण नन्तर त्याला वस्तिस्थितीची जाणीव झाली. आपण काय करुन बसलो हे माकडाला जाणवले.त्याने ओळखले की आता आपले काही खरे नाही. हा सिंह; चिडलेला सिंह आपल्याला नक्कीच ठार मारणार.माकडाने तेथुन लगेच पळ काढला
सिंहाची झोप ताडकन उडाली त्याने डोळे उघडुन पाहीले. कानाशीलात काहितरी जोरात लागले हे त्याला कळाले. पळुन जाणा-या माकडाला पाहुन त्याला काय झाले हे त्याला कळाले. माकडाने सिंहाच्या ,जंगलच्या राजाच्या कानाखाली वाजवावी याचेच त्याला आश्चर्य वाटले.
क्षणभर माकडाच्या धाडसाचे कौतूक ही वाटले. पण मग नन्तर त्याने विचार केला की हे माकड जंगलात जाईल झाला प्रकार सर्वाना सांगेल.
मग जंगलच्या राजाची अब्रूच गेल्यासारखे होईल. कोणालाच आपले भय रहाणार नाही. या माकडाला आत्ताच मारुन टाकायला हवे.
सिंह माकडाला पकडण्यासाठी त्याचा पाठलाग करु लागला.
माकड पुढे पळु लागले सिंह त्याच्या मागे. माकड पुढे सिंह मागे. माकड पुढे सिंह मागे. आता काही आपण वाचत नाही असा विचार करुन माकड जंगलातून आणखी जोरात पळु लागले.
माकडाला मारुन टाकलेच पाहीजे असा विचार करुन सिंह तेवढ्याच जोरात माकडामागे धावु लागला. माकड वाट सापदेल तसे धावत होते सिंह त्याच्या मागे धावतच होताच माकड पुढे सिंह मागे आडवेतिडवे या झाडा आडुन जा त्या पाय वाटेने जा इकडुन तिकडून धाव जीव मुठीत धरुन माकड पळत होते. आणि माकडाला जिमन्त सोडायचे नाहीच हे ठरवुन सिंह त्याच्या मागे पळत होता.
इकडे तिकडे आडवे तिडवे पळुन पळुन माकड आता दमुन गेले होते. लपायला जागा शोधत होते. तेवढ्यात त्याला जंगलात वाटेवर पडलेले एक कसले तरी जुने वर्तमानपत्र सापदले. वर्तमान पत्र उघडुन त्याच्या आडोशाने माकड एका झाडाच्या बुन्ध्याला टेकुन बसले.
माकडाच्या मागेमागे असलेला सिंह तिथेही पोहोचलाच. त्याने पाहिले की कोणीतरी वर्तमानपत्र वाचत बसलेला आहे.आपण त्यालाच विचारु यात असा विचार करुन सिंहाने विचारले सुद्धा " दादा या बाजुने कोणी एखादे माकड जाताना पाहिले तुम्ही?"
या प्रशनाला उत्त्तर म्हणुन माकडाने वर्तमानपत्राआडुनच प्रतीप्रश्न केला " कोणते माकड ? तेच का; की ज्याने सिंहाच्या कानाखाली वाजवली ते?"
सिंहाला काही सुचेना तो खालमानेने परत फ़िरला. म्हणाला "ऒ ! तेवढ्यात पेपरात छापुनसुद्धा आले? संपलंच की सगळं"
ओशो रजनीशांची एक खासीयत आहे काही सांगताना ते विनोदाचा बरेचदा वापर करतात
एखादा विनोद सांगायचा आणि त्याचा रूपक म्हणुन वापर करून एखादा मर्मबोध करायचा.
ही त्यांची आवडती ष्टाईल.
ह्या विनोदाचा रूपक म्हणुन ते कसा सुंदर वापर करतील / ते कसा सांगतील बघा ...
अगोदर विनोद पूर्ण सांगतील आणि मग आधुन बधुन त्या विनोदातली वाक्ये घोळवत रहातील.
एक जंगलात एक माकड रहात होते.माकडाला एकदा वाटले की यदाकदाचित कधी जंगलाचा इतिहास लिहीला गेला तर आपले नाव सुवर्णाक्षरात लिहीले जावे.
आपण सुद्धा या माकडासारखे असतो. वर्तमानात जगायच्या ऐवजी आपण जेंव्हा या जगात नसू तेंव्हा लोक आपल्याबद्दल काय बोलतील याचा विचार करत असतो. काही उपयोग आहे का?
पण आपल्याला नेहमीच वाटते असते की आपले नाव सुवर्णाक्षरात लिहिले जावे म्हणून.
मग विचार करु लागतो........वर्तमानाच नाही तर भविष्यकाळाचा ज्यात आपण असणारसुद्धा नाही त्या भविष्याकाळाचा विचार. मन हे खूप अजब असते. वर्तमानाचाच आधार घेउन ते तुम्हाला इतरत्र रमवत असते. स्वत:चे जाळे विणत असते तुम्हाला त्यात अडकवत असते.
जरा ओळ्खा या मनाला.
म्हणते की काहितरी असे कर जे तुला शक्य नाही का तर लोकानी त्यासाठी तुझे नाव घ्यावे.त्याने तुला आत्ता काहीही मिळणार नाही. आणि जेंव्हा लोक नाव घेतील तेंव्हा ते ऐकायला तू असणार सुद्धा नाहीस.
आपण थोडेसे त्या सिंहासारखे असतो. झोपलेले.... स्वप्नात मग्न. वर्तमाना कडे पूर्ण पाठ फ़िरवुन..भूतकाळाच्या गतवैभवात रममाण होऊन झोपलेले असतो. वर्तमान नावाचे काही असते हे विसरुन स्वत:च्या साम्राज्यात रममाण असतो. एखादे माकड येते आपल्या कानाखाली देते. आपली स्वप्ने नगरी चक्काचूर होते स्वप्ने विखुरली जातात.. एखादे माकड आपली स्वप्नांची दुनिया उलटी करुन जाते. एखादा क्षुल्लक प्रसंग आपल्या ताळ्यावर आणुन ठेवतो.हवेत उडणारी पावले जमिनीवर टेकवतो.
आपल्याला राग येतो. ताळ्यावर आल्याच्या नव्हे ....तर आपण स्वप्नात होतो हे लोकाना समजले याचा
त्या क्षुल्लक कारणाच्या मागे आपण हात धुऊन पूर्ण शक्तिनिशी लागतो.
आणि तद्दन फ़ालतू का होईना ध्येय अगदी हातापाशी जवळ आलेले असताना एखाद्या किरकोळ कारणासाठी शेपुट फ़िरवुन माघार घेतो.
लोक काय म्हणतील या बाऊ ला घाबरुन आपल्याला जमत असलेले कामही अवघड करुन ठेवतो.
सिंहाने वर्तमानपत्र बाजूला करुन बघितले असते तर माकड सहज हाती लागले असते.
माकडाने वर्तमानपत्राआडुनच प्रतीप्रश्न केला " कोणते माकड ? तेच का; की ज्याने सिंहाच्या कानाखाली वाजवली ते?"
सिंहाला काही सुचेना तो परत फ़िरला म्हणाला "ऒ तेवढ्यात पेपरात छापुनसुद्धा आले? संपलंच की सगळं"
सत्य हे असेच असते. ते एखाद्या पातळ पडद्याआड दडलेले असते. आपण तो पडदा बाजूला करायचे कष्ट घेतच नाही.
कुणाच्या तरी एखाद्या क्षुल्लक शब्दाला महत्व देऊन "संपलंच की सगळं" म्हणत माघार घेतो. सत्य हे आपल्या समोरच असते. फ़क्त आपण त्या भोवतालचे लोकाचार , समाजमन , शिष्ठाचार , जात, धर्मग्रन्थ हे असले भ्रामक पडदे बाजूला सारत नाही. सत्य पडद्या आडच रहाते.आपण मात्र त्याच्या अगदी जवळ जाउन माघारी फ़िरलेलो असतो...... पराभूत होऊन.
:::::::स्वामी विजुभौ
( डीस्क्लेमर: प्रस्तूत रूपक हे ओशो रजनीशानी कधीही कोणत्याही व्याख्यानात सांगीतले नव्हते. हे लिखाण हे विजुभौंचे विचार आहेत.)

हॅट्स ऑफ टू लिलीयन

एखादे पुस्तक वाचल्यानन्तर त्यातील पात्रे आपल्याला भेटली तर किती बरे असे वाटत रहाते. आणि जर ते पुस्तक तुमच्या आवडत्या पुस्तकापैकी असेल तर मग विचारायलाच नको.
"चीपर बाय डझन" हे पुस्तक मी प्रथम किर्लोस्कर मासीकातुन तुकड्यातुकड्यात वाचले. मग नन्तर कधितरी ते आख्खे पुस्तक हातात लागले. आजतागायत त्याची पारायणे झाली तरी मनातुन अजून् सुटले नाही.
चीपर बाय डझन ही बारा भावन्डे आणि त्यांचे आईवडील यांची खरी कहाणी. त्या बारा भावंडांपैकी दोघानी सांगितलेली. आपल्याला आई वडीलानी कसे वाढवले; त्या सगळ्या गम्मती सांगतानाच पालकत्व कसे असावे हेही सांगणारी मस्त गोष्ट असे या पुस्तकाचे वर्णन करावे लागेल.
फ्रॅन्क गिल्ब्रेथ आणि लिलीयन मोलर ही दोघे टाईम ऍन्ड मोशन स्टडीचे कन्सल्टन्ट. त्याना बारा मुले होती. इन्डस्ट्रीयल कन्सल्टन्सी देताना करावे लागनारे सर्व प्राथमीक प्रयोग त्यानी आपल्या मुलांवर केले. यात गणीत शिकवण्यपासून ते भाषा शिकण्यापर्यन्त सर्व काही. मुलाना भाषा लवकर शिकता यावी तसेच मिळालेला प्रत्येक क्षण उपयोगात आणता यावा यासाठी मुले आंघोळ करताना भाषेच्या रेकॉर्ड्स लावुन ठेउन त्यांच्या कानावर भाषा पडावी किंवा झोपतानासुद्धा मुलाना सहजगत्या गणीताची सूत्रे डोळ्यासमोर दिसावीत म्हणून ती छतावर लिहुन ठेवणे यासारखे मजेदार उपाय त्यानी केले.
कारखान्यात हालचालींचे व्यवस्थापन शिकवताना सर्वात आळशी कामगार समोर ठेवा की तो कमीतकमी हालचालीत काम करतो असे भन्नाट पण उपयोगी युक्त्यांचा वापर करत.
बारा मुले घरात कशी एकमेकांची देखभाल करताना होणार्‍या गम्मती हा तर या पुस्तकाचा सर्वात धम्माल भाग.
शस्त्रक्रिया करताना सर्जनना स्वतःचावेळ वाचवता यावा म्हणून या गिल्ब्रेथ महाशयानी स्वतःवर शस्त्रक्रिया करतानाच्या फिल्म्स घेउन त्याचे ऍनालिसीस केले. तसेच दाढी करताना दोन्ही हातानी केल्यास १९ सेकन्द वेळ वाचतो असेही प्रयोग करुन पाहिले. प्रत्येक कामात हालचाली कमी वेळात करुन वेळ कसा वाचवता येईल याचे अनेक प्रयोग या पुस्तकात आहेत.
मुलाना श्रमाचे महत्त्व कळावे म्हणून घरातल्या घरातच कामांचे लीलाव ( सर्वात कमी बोली बोलेल त्याला काम )करायची पद्धत किंवा कामाची वाटणी यातुन घराचे व्यस्थापन असे अनेक प्रसंग यात आहेत.
एकदा त्याना कोणीतरी विचारले की इतका वेळ वाचवुन करायचे काय? गिल्ब्रेथ महोदयाने उत्तर दिले मिळालेले क्षन आनन्दात जगायचे.फ्रॅन्क गिल्ब्रेथने दुसर्‍या महायुद्धाच्या कालात अमेरेकन सैन्याला हालचालींचे व्यवस्थापन कसे करायचे तेही शिकवले.
फ्रॅन्क गिल्ब्रेथच्या मृत्यु च्या घटनेवर हे पुस्तक संपते. पण त्याचे वेगवेगळे प्रयोग मनातुन कधीच संपत नाहीत
हे पुस्तक वाचुन झाल्यावर मी कोठेतरी वाचले की त्या बारा मुलांची आई लिलीयनला अमेरीकेत १९४७ सालचे लेडी ऑफ द ईयर हे पारीतोषीक मिळाले.
जालावर शोध घेत असता या पुस्तकाच पुढचा भाग " बेलीज ऑन देअर टोज" ( पायांवरची पोटे) ही उपलब्ध आअहे तसेच चीपर बाय डझन च्या कहाणीवर अनेक चित्रपट होउन गेले आहेत.
बारा मुलंची आई असलेल्या लिलीयनचे पुढे काय झाले याचा जालावर शोध घेत असता या पुस्तकाच पुढचा भाग " बेलीज ऑन देअर टोज" ( पायांवरची पोटे) ही उपलब्ध आअहे तसेच चीपर बाय डझन च्या कहाणीवर अनेक चित्रपट होउन गेले आहेत.
बेलीज ओन देअर टोज मध्ये बाप नसताना त्यांच्या आईने सगळ्याना कसे साम्भाळले;आणि त्यावेळी करावा लागलेला संघर्ष याबद्दल लिहिले आहे.
फ्रॅन्क गेल्यावर लिलीयन ने त्याचा इन्डस्ट्रीयल कन्सल्तन्सीचा व्यवसाय संभाळला.
एखादी "स्त्री" इन्डस्ट्रीयल कन्सल्टन्सी करु शकेल यावर त्या काळच्या लोकांचा विष्वासच बसत नव्हता परिणिती कित्येक क्लायन्ट इतरत्र जाउ लागले. लिलीयनला आपणही कन्सल्टन्सी करु शकतो हे लोकाना पटवुन सांगावे लागायचे. एखादी स्त्री औद्योगीक सल्लागार असु शकते हे त्यावेळच्या अमेरीकन समाजाला पटतच नव्हते. लिलीयन ने तिची अनेक पुस्तके पती फ्रॅन्क गिलब्रेथ च्या नावावर लिहिले आहेत.
लिलीयनला तिच्या आयुष्यात अनेक पुरस्कार मिळाले.त्यात २० वेगवेगळ्या प्रकारच्या मानद पदव्या आहेत. १९२१ साली ती सोसायटी ऑफ इन्डस्ट्रीयल इंन्जेनीयर या संस्थेची पहिली महिला सभासद होती. फूट पेडल ट्रॅश कॅन आणि फ्रीज मधली कप्प्यांची दारे हे शोधही तिच्या नावावर आहेत. होममेकर ऍन्ड हर जॉब आणि लिव्हिन्ग विथ अवर चिल्ड्रेन ही दोन पुस्तके तिने केवळ गृहिणींसाठी स्वातन्त्र्य आणि जगण्याचा आनन्द कसा घ्यावा हे सांगत लिहिली. यात तिने घर ही एक आनन्दाची जागा आहे व्यक्तिमत्व खुलण्यासाठी आनन्दी घर गरजेचे आहे. आनन्दी घर राखण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारी उचलली तरच हे शक्य होते हे ठामपणे मांडले. वयाच्या नव्वद वर्षापर्यन्त लिलीयन कार्यरत राहिली. वेगवेगळ्या कम्पन्यांमध्ये संशोधन करत वेगवेगळ्या विद्यापीठात लेक्चर्स देत तिने काम केले. २ जानेवारी १९७२ ला वयाच्या त्र्याण्णवाव्या वर्षी देहावसान झाले.
गृहिणी झाले की सम्पले चूल मूल हेच आपले करीयर न मानता स्वतःच्या बारा मुलांचे नीट संगोपनकरुनही लिलीयन अखंड कार्यरत राहिली. एक यशस्वी व्यक्ती म्हणून औद्योगीक जगाला तीची दखल घ्यायला लावली.
हॅट्स ऑफ टू लिलीयन गिल्ब्रेथ.

गुलमोहोर

गुलमोहोराचे प्रत्येकाचे नाते काही वेगळेच असते. आंबा चिंच यांसारख्या राकट आणि जटाधारी वडीलधारे वडपिंपळ यांच्या धीरगंभीर गर्दीत एखाद्या चॉकलेट हीरोसारखे एकदम तुकतुकीत दिसणारे हे देखणे झाड काही वेगळेच भासते.
या झाडाची मोहिनी मला कधी पडली माहीत नाही.... आमच्या सातार्‍याच्या न्यू इंग्लीश स्कूलच्या आवारात गुलमोहोराची बरीच झाडे आहेत.... शाळा सुरु होण्याच्या सुमारास गोलमोहोराच्या पाकळ्यांच्या शाळेत अक्षरशः पायघड्या घातल्यासारखा सडा असायचा..... त्या केशरी पिवळ्या पाकळ्यांची शोभा काही वेगळीच वाटायची.....
शाळेत जायचे म्हणजे गुलमोहोरला भेटायला जायचे हे डोक्यात इतके फिट्ट बसले आहे की.अजूनही एखाद्या रस्त्यावर फुललेला गुलमोहोर पाहीला की त्या कोपर्‍यावरून कोणीतरी वर्गशिक्षक येतील असेच वाटत.
golmohor2
त्या केसरी पाकळ्या पुस्तकात ठेवायचो...मग कधीतरी त्या पाकळीवरच्या रेशा न रेशा पुस्तकातल्या त्या पानावर उमटायच्या. पाकळीला एकदम कडक्क इस्त्री झालेली असायची पण त्याचा रेशमी स्पर्षाची जादू मात्र अजून टिकून असायची.
पुस्तकात ठेवलेल्या त्या पाकळ्यांमधून गुलमोहोर माझ्या कवितेत उतरला हे मला कळालेच नाही.... सांगलीच्या आमराईत भेटलेल्या गुलमोहोरावर केलेल्या एका कवितेने आपल्या कविता लोकाना आवडू शकतात..... त्या काव्यवाचन स्पर्धेत भरभरून दाद मिळवू शकतात हे जाणवले....तशी कविता मी आंब्याच्या किंवा पिंपळाच्या झाडावर लिहू शकलो नसतो.
सगळीच झाडे हिरवी असतात. पिंपळाच्या झाडाचा हिरवा रंग उगाच काहीतरी गूढ असल्याची जाणीव करून देतात.
जी एंच्या लिखाणाच्या प्रेमात होतो तेंव्हा उगाचच प्रत्येक कथा पिंपळाच्या झाडाखाली बसून वाचावी असे वाटायचे. आंब्याची ती हिरवी छटा उगाचच छापील शासकीय कागदाचा कोरदे पणा जाणवून देते.
पेरूच्या पानाची पोपटी छटा मोहवते पण पानाचा कठोरपणा लगेच दाखवते. निळ्या पांढर्‍या आकाशाच्या बॅकग्राउम्डवर नारळाच्या झावळ्यांचा हिरवेपणा थोडासा काळपटच वाटतो. एकदा चिनाराचे झाड पाहिले. त्याचा पसारा लक्षात येईपर्यन्त ते चिंचेचे झाडच वाटत होते..... त्याखालच्या बांधावर जर एखादी हिरवे नऊवारी कारभारीन उभी असती तर... कोल्हापुरात किंवा सातार्‍यात आहे असेच समजलो असतो चिंचेच्या हिरव्या तांबूस छटेत दात आंबवेल असा खट्यालपणा असतो. त्यात एक भारलेपणा असतो. चिंचेवर मुंजा रहातो......असे काहीतरी लहानापणी ऐकले होते...... पण मग आम्हाला दोन चिंचा खाल्या मुले होणारा खोकला त्याला का होत नाही...... किंवा पिंपळावरच्या मुंजाला खोकल्या मुळे हैराण होऊन झोप येत नसेल ना ......असे काहे प्रश्न विचारून पाठीत धपाटे खाल्याचा अनुभव गाठीशी होताच.
गुलमोहोराचे माझे नात एनक्की जुळले ते मला सांगता यायचे नाही पण ते मित्र सखा सुर्‍हूद या पलीकडचे होते. वक्त्याचे एखाद्या अलिप्ततेने ऐकणार्‍या एखाद्या जाणकार श्रोत्याचे असावे तसे.....
शाळेच्या सुट्टीच्या वेळेत गुलमोहोराखाली बसून मित्रांसोबत डबा खायचो.... गुलमोहोराच्या वाललेल्या शेंगानी शिवाजी औरंगजेब युद्ध खेलायचो... एकदम तरवारी चा फील देणार्‍या त्य शेंगा आम्हा प्रत्येकाच्या दप्तरात असायच्या... कधीतरी आईने दप्तर आवरले की त्याबद्दल जाब द्यावा लागत असे.
गुलमोहराचा बुंधा हा आमचा खेळताना दप्तरे ठेवण्याचा हक्काचा भोज्जा असायचा... तोच कधीतरी क्रिकेटचा ष्टंप व्हायचा . तर कधीतरी खोखो चा खांब व्हायचा.
पाकळ्यांचा लालसर तपकिरी पायघड्या घातल्यागत सडा असायचाच त्यामुळे गुलमोहोराखाली कोणी खेळताना पडले आणि त्याला खरचटले असे कधीच झाले नाही.
का कोणास ठाऊक झाडाना जर बोलता आले असते तर आंबा वगैरे झाडे ही तुमची विचारपूस करताना काय भो कस काय लै दिवसानी दिस्लात यंदा मुक्काम हाय ना....आपल्या बांधावरल्या झाडाला यंदा झक्कास मोहोर आलाय्....रायवळ हाय पन एकडावा हातावर पिळला की साकर एक्दम जणू..... अशी विचारपूस करतील....... हिरवीगार चिंच म्हणेल बसा जरा दमला असाल.... थंड व्हा... का घाई करताय जायची. अशी भाबडी नाते जपणूक करतील असे वाटते. गुलमोहोर थोडासा अलीप्त ...पण प्रेमळ विचारपूस करेल.... तुमच्यावर पाकळ्यांचा वर्षाव करेल्..पण जाताय म्हणालात तर थोडे थांबला असतात तर बरे झाले असते वगैरे न बोलता.... आता तुम्हाला पाच ची एस्टी मिळेल..... नाक्यावर रीक्षा असेलच असही म्हणेल.... असेच वाटते
एवढी विचित्र वाटणारी कोकणस्थी अलिप्तता सोडली तर नाते संबन्ध जोडायला गुलमोहोर हा सर्वात मस्त.......
कडकडीत उन्हात स्वतःसोब्त तुम्हालाही फुलवणारा.
गुलमोहोराच्या झाडाचा प्रॉडक्टव्हिटी नावाच्या गद्य प्रकाराशी काहीही संबन्ध नसतो. त्याची फुले कोणी देवाला वाहिल्याचे पहाण्यात काय ऐकण्यात सुद्धा नाही शुभेच्छाबुके सारखी खास जरबेरा ऑर्चीड्स गुलाबाचा नखरा असलेली राखीव जागा गुलमोहोराच्या नशीबात नसते. हे असले बंदिस्त होऊन खुलत बसणे गुलमोहोराला मानवतच नाही
म्हणूनच की काय गुलमोहोराला फुलायला ऐसपैस आभाळाभर जागा मिळते... निळ्या पांढर्‍या आकाशाच्या बॅकड्रॉप वर गुलमोहोर एखाद्या मुक्तहस्त चित्राप्रमाणे कलंदर पणे खुलतो.
jhad1
फांद्यांचा आटोपशीर पसारा डहाळीची नव्हाळी सदोदीत तुकतुकीत असते... पानांचा मंत्रचळ लावणारा रेखीव पिसारा.... आणि त्याच्या मोरपिसाच्या आकाराच्या पाकळ्या .... हे सगळे इतके आखीव रेखीव असते की एखाद्या आईने तिच्या सात आठ वर्षाच्या मुलाला न्हाऊ घालून नीट भांग वगैरे पाडून ठेवलाय्.आणि ते मूलदेखील अगदी पाटावर देवासारखे बसलय असेच वाटतय.
गुलमोहोराच्या झाडाचा हा रेखीवपणा सदैव जाणवत असतो....
हे झाड भारतीय नाहिय्ये.... मादागास्कर बेटावरून कधीतरी कोणीतरी हे झाड इथे आणले....... आणि वड पिंपळ बाभळ उंबर ही खडखडीत नाव कुठे गुलमोहोर हे नजाकतदार नाव. तशीच नजाकत पानांच्या रचनेत ही. एकदम आखीव रेखीव........ पिंपळासारखी वळणदार वेलबुट्टी नसेल पण फारशी आकर्षकक नसलेली पाने रेखीवपणे मांडली तर जे भौमितीक सौंदर्य जाणवते त्याला तोड नाही
pane
पण जाऊ दे ना.... एकदा असेच कोणीतरी म्हणाले की सौंदर्य ही केवळ बाह्य गोष्ट नव्हे..... वरवरची नव्हे ........ सौंदर्य हे अंतरंगात असते......... त्यावर दुसरा उत्तरला हो बरोबर आहे तुझे.. सुंदर स्त्रीचे र्‍हदय सुंदर असते. एवढेच काय तीचे यकृत ,प्लीहा लहान आतडे सुद्धा सुंदर असते.........
जाउ दे. इतकी चिरफाड कशाला करायला हवी.
गुलमोहोर जगात बहुतेक देशात आढळतो... उष्ण, समशीतोष्ण कटीबंधात तर हमखास...
असो.......
एखाद्या कौलारू घराशेजारच्या गुलमोरामुळे घराचे सौंदर्य कितीतरी पटीने वाढते. का कोणास ठाऊक ते घर एकदम आपलेसे वाटू लागते. गुलमोहोराच्या झाडाची सावली वड चिंच पिंपळासारखी डेरेदार नाही. पण पानापानांच्या नक्षीतून झिरपत जाणारा तो उन पावसाचा खेळ भर उन्हातही एक वेगळाच अनुभव देतात
शाळेत असताना आम्ही अजून एक खेळ खेळायचो....... गुलमोहोराच्या पाकळ्यां नखाला लावायच्या... बरोब्बर पाच पाकळ्याचे फूल आणि त्यातही गम्मत म्हणजे एकच पाकळी वेगळ्या रंगाची...... आणि मधोमध असलेला तो तुरा
tura
ती मधोमध असणारी पांढरी ठीपकेवाली पाकळी चवीला किंचीत आंबट लागते
pakli
हे सुद्धा गुलमोहोरच करू जाणे.... एकच पाकळी वेगळी.......
गुलमोहोराच्या झाडाचा अयूर्वेदात काय उपयोग आहे हे मला माहीत नाही.... बहुधा काही फारसा महत्वाचा नसेल.........
या झाडाला फारशी सावली नाही.... त्याची फळे फारशी उपयोगी नाहीत्....त्याची पाने फारशी उपयोगी नाहीत..... कचराच जास्त होतो... फांद्या /लाकूड फारसे उपयोगी नाही तरिही रॉयल पॉईन्शियाना म्हणजे गुलमोहोर जगातल्या पहिल्या पाच देखण्या झाडांत गणला जातो... तो जगभर वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. फ्लॅम्बॉयन्ट ट्री , मोराच्या फुलांचे झाड झाड , जंगलातली आग .......
आश्चर्य वाटते असे नक्की काय आहे की जे इतर झाडांत नाही आणि गुलमोहोरात आहे...... बहुधा लोकांच्या मनाशी सलगी करण्याची जादू..... ती तर नावापासूनच आहे... गुलमोहोर म्हणले की उगाचच ती उर्दू शायरी आठवते.... ताजमहालावर॑ची फार्सी वेलबुट्टी आठवते.
प्रत्येक सर्‍हदय माणसाचे गुलमोहोराचे एक अनामिक नाते असते.... नसेना का गुलमोहोराचे झाड फारसे उपयोगी........ नसतो का आपला एखादा मित्र्...फारसा उपयोगी न पडणारा.... थोडासा फटकून रहाणारा ...स्वतःला शिष्ठ समजणारा. पण त्याच्याशी आपली मैत्री कायम रहाते....
एखाद्या हळव्या क्षणी या मित्राने आपल्याला हवा असलेला तो कसलासा खांदा देऊ केलेला असतो...........
गुलमोहोराचे तसेच काहीसे आहे......... माझे गुलमोहोराचे नाते काय आहे कोण जाणे पण आहे हे नक्की......
शाळेत असताना वाड्यात रहायचो........... तिथेही भरपूर झाडे होती..पण गुलमोहोर नव्हता जेंव्हा वडीलानी घर बांधले तेंव्हा झाडे कोणती लावायची हे विचारल्यावर प्रत्येकाने गुलमोहोराचेच नाव घेतले...... त्या नन्तर आंब्या फणसाचे
गुलमोहोराच्या झाडाची आणखी एक गम्मत लक्षात आली का......... पिंपळावर मुंजा ...ब्रम्हसम्नध असतो..... चिंचेवर खवीस असतो... वडाच्या झुलणार्‍या पारंब्यावर हडळ असते....... बाभळीसारख्या काटेरी झाडावर सुद्धा झुटिंग असतो....... पेरूच्या झाडावर चेटकीण असते... नारळाच्या झाडावर पिसे की कायसे असते................ ही सगळी झाडे आमची हक्काची खेळण्याची झाडे....... पण रात्रीची शिफ्ट ही या मंडळीनी वाटून घेतलेली असते....
चिंचेचे झाड तर रात्री भितीदाय्क वाटते......... दुपारी काहीतरी आर्या वगैरे सांगणारी पिंपळाची सळसळ रात्री काही वेगळीच भाषा बोलत असते....
आमच्या घराशेजारच्या गुलमोहराच्या फांद्या रात्री वार्‍यानी कर्र कर्र वाजायच्या.....पण ती कर्र कर्र कधीच भीतीदायक वाटायची नाही......... उलट "आहे रे मी सोबतीला ..."अशीच काहिशी असायची.
उंबराच्या झाडाखाली दत्ताचे जागृत देवस्थान असते.... पिंपळाखाली शनी मारुती.... चिंचेशेजारी गणपती अशी देवानीही झाडे वाटून घेतलेली असतात.
गुलमोहोराचे झाड मात्र या सगळ्यापासून अलीप्त असते.......... जणु ते सांगत असते तुम्ही कोणत्या का देवाला भजत असाल...... मी तुमचा खीसा हलका करणार नाही ....तुमच्याशी गूज गोष्टी करेन........ मनावरचा ताण मात्र निष्चीतच हलका करेन.
jhad
आमच्या सातार्‍याला एक रस्ता आहे फारसा रहदारीचा नाही... मात्र नव्या धाटणीची स्वतन्त्र घरे असलेला आहे... एक दोन हॉस्पीटल..एक शाळा.... दुकाने वगैरे जवळजव़ळ नाहीतच असा........ अगदी निनावी.... केंव्हा कोण जाणे कोणाच्या तरी लक्षात आले की त्या दोन अडीच किलोमीटर्च्या रस्त्यावर गुलमोहोराची १०० पेक्षा जास्त झाडे आहेत...... लोकानी स्वतः होऊनच त्या रस्त्याचे नामकरण केले "गुलमोहोर पथ"
ते नाव आपोआप लोकांच्या तोंडी रुळले...
मग तेथे संध्याकाळी पायी फिरायला जाणारी मंडळी वाढली.....
तेथे हमखास दरवर्षी गुलमोहोर दिन साजरा केला जातो......... त्या निमित्ताने लोक एकत्र येतात....चित्रांचे प्रदर्शन ..काव्य संध्या वगैरे साजरे होतात...... ... विषय अर्थातच गुलमोहोर हाच असतो.
चित्रे कविता बहुधा रोमॅन्टीकच असतात. जणु गुलमोहोराला दु:ख ,भूक, इतर विषयांचे वावडे असावे...
हे मी बोलूनही दाखवले....की गुलमोहोराला फक्त प्रेमकवितेतच स्थान का दिलय....
त्या गुलमोहोर डे ला एकजण काव्यवाचनात एक जण त्याची कविता वाचत होता...
"पहाटे तुझ्या कुशीतून .....गुलमोहोराला पहावं"
शेजारी बसलेले मधूसूदन पत्की हळूच पुटपुटले... "वाटलं तर मोहोरावं नाहीतर गुल व्हावं"
कसे कोण जाणे पण हे पुटपुटणं सगळ्याना ऐकू गेलं..... गुलमोहराच्या दालनात विनोदाची भर टाकून गेलं