Sunday 31 July 2011

१८५७ अ हेरीटेज वॉक (1)

भारताच्या नव्या जन्माची ही कथा. खरेतर या कथेला सुरुवात होते ११ मार्च १६८९ पासून
मराठी साम्राज्याचा समूळ नायनाट करायचा निर्धार करून औरंगझेब महाराष्ट्रात उतरला खरा.पण त्याला ते तितकेसे जमले नाही ते त्याच्या अंगलटच आले. ११ मार्च ल औरंगझेबाने छ. संभाजी महराजाना हालहाल करून ठार मारले. छ. संभाजी महाराजांच्या मुलाला शाहू महाराजाना कैदेत ठेवले. चिडलेल्या मराठ्यांनी मग औरंगझेबाला स्थिर बसूच दिले नाही त्याला हर प्रकारे त्रास देणे सुरू केले. सन १६९७ सालात छ. राजाराम महाराजानी तह करण्याचा प्रयत्न केला पण तो औरंगझेबाने धुडकावून लावला.
इस १७०७ मध्ये औरंगझेब मरण पावला त्या नंतर त्याच्या वंशजांच्यात मुघल राजवटीच्या वारसांमध्ये राजा होण्याची चुरस सुरु झाली.
औरंगझेबाने भारताचा बराचसा मोठा भूभाग एकछत्री करभाराखाली आणला होता.
आज ज्याला आपण अफगाणीस्तान , पाकिस्तान , बंगलादेश आणि भारत म्हणून ओळखतो या सर्व भूभागावर औरंगझेबाचे साम्राज्य पसरले होते. औरंगझेबाने पसरवलेले हे एवढे मोठे साम्राज्य कोण पेलणार हा एक प्रश्नच होता.त्याच्या मुलांच्यात ना त्याच्या एवढी बुद्धीमत्ता होती ना कुवत.
साम्राज्य स्वतःच्याच ओझ्याखाली चिरडून जाऊ लागले.
मराठ्यानी छ. शाहु महाराजाना स्वतन्त्र केले आणि मराठे आणी दिल्लीच्या गादीची मराठा सत्तेची थेट वैर यात्रा अल्पकाळ तरी थांबली.
वयाच्या८९ व्या वर्षी सतत ४८ वर्षे एकछत्री सत्ता उपभोगून औरंगझेब गेल्यानन्तर मुघलसाम्राज्याचा मात्र झपाट्याने अस्त होऊ लागला. दिल्लीच्या सिंहासनावर बादशहा अक्षरशः ये जा करू लागले. कोणीतरी यावे गादीवर बसावे आणि कपटाने दुसर्‍याने त्याचा काटा काढत स्वतःला राजा म्हणून घोषीत करावे हा नित्य परीपाठ झाला. मुहम्मद रंगीला असा ज्याचा उल्लेख होतो तो मुहम्मद शाह सतत कोणा ना कोणा कडुन हरतच होता . १७३९ मधे नादीर शहा दुर्राणी ने तर कळसच गाठला . मुहम्मद रंगील्याने दिल्ली दरावाज्याच्या किल्ल्या स्वतः होऊन नादीरशहा च्या ताब्यात दिल्या नादीरशा दिल्लीत घुसला त्याने दिल्ली अक्षरशः कफल्लक केली . पाहुणा म्हणून राहिला आणि जाताना दिल्लीतील ३३ हजार लोकांचे शिरकाण करत मयूर सिंहासन ,कोहीनुर हीरा ,दर्या ई नूर हीरा अशी बरीच मोठी लुट घेवुन गेला . मुहम्मद रंगील्या बद्दल लोकांच्या मनात इतका तिरस्कार होता की त्याच्या नर्तकी असलेल्या बायकोने बांधलेल्या मशीदीला लोक "रंडी की मस्जीद" म्हणून सम्बोधत.
मुघलांचे अफगाणीस्थान पासून बंगाल पर्यन्त पसरलेले राज्य आकसत जाऊन अवघ्या लाल किल्ल्याच्या भिंतीत सिमीत झाले. १६९७ साली काबूल पासून कलकत्त्या पर्यन्तच्या २४ मुलुखातून एकुण ३८,६२४,६८० इतक्या पौंडाचा महसूल गोळा करणारे साम्राज्य अक्षरशः भिकेला लागले.
१७६५ सालच्या बक्सरच्या लढाईनंतर तर तात्कालीन बादशहा शाह आलम ने इस्ट इंडीया कंपनी बंगाल बिहार आणि ओरीसा बरेच काही गमावले. लॉर्ड क्लाईव्हने मुघल साम्राज्याची नाणी देखील इस्ट इंडीया कंपनी ठरवू लागली. हिंदुस्थानात कंपनी सरकारचे बस्तान व्यवास्थीत बसवले.
छ शाहु महाराजानी पेशव्याना पंतप्रधान केले त्यांच्या निधना नंतर छ रामराजानी नाममात्र राजा रहाणे पसंत केले आणि राज्यकारभार पुर्णपणे पेशव्यांच्या स्वाधीन केला.
१७६१ च्या पानिपतच्या युद्धा नंतर मराठेशाही काही काळ दुर्बळ झाली मात्र माधवराव पेशव्यानी मराठा साम्राज्याला पुन्हा वैभवाचे दिवस दाखवले.
पण त्यंच्या निधना नंतर मराठा साम्राज्याने एक द्रष्टा गमावला.
पेशवे शूर होते पण अंतर्गत कलहांमुळे पेशवाई देखील दुबळी होत गेली. सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात तर राज्य कारभार इतरांच्या हाती गेला.
त्या नंतर गादीवर आलेला पेशवा दुसरा बाजीराव हा तर पळपुटा बाजीराव म्हणूनच इतिहासात ओळखला जातो. अटकेपर्यन्त झेंडे फडकवणार्‍या पेशव्याना पुण्याहून पळून जायची वेळ आली.
अहमदनगरच्या तहानंतर तर पेशव्यांचे सत्ता जवळजवळ संपुष्टात आली.
१८१८ साली खडकी आणिकोरेगावच्या लढाईनंतर तर पेशव्यांची सत्ता संपुष्टात आली.
इस्ट इंडीया कंपनीने पेशव्यांची रवानगी कानपूरजवळील बिठूर नावाच्या एका खेड्यात केली.
 माउन्ट स्टुअर्ट एल्स्फिन्टनने सातार्‍याच्या गादीवर छ.प्रतापसिंहांना बसवले. दत्तक वारसाच्या प्रश्नावरून १८४९ सातार्‍याची गादी खालसा देखील केली.
एका व्यापारी कंपनीची ,इस्ट इंडीया कंपनीची भारताच्या विशाल भूभागावर सत्ता प्रस्थापित झाली

1 comment: